शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

प्रस्तावच विलंबित !

By किरण अग्रवाल | Updated: January 13, 2019 01:45 IST

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाबदार धरून काय कारवाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.

ठळक मुद्देउपलब्ध निधी खर्ची कसा पडेल, याची चिंता संबंधिताना लागून राहिली आहे.योजनेसाठीची तरतूद कमी व बजेट अधिक, असेही घडून येते. त्यामुळे फायलींचाच प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर सुरू राहतो.मार्चअखेरीस घाईघाईत वर्कआॅर्डर काढल्या जातील तर कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होईल.

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाबदार धरून काय कारवाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.शासनाच्या विविध योजनांतर्गत खर्चासाठी मंजूर निधीमधील सुमारे ७० टक्के रक्कम डिसेंबरअखेर उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात कामांवर होणारा खर्च व त्यासंदर्भातील प्रशासकीय मान्यतांचे प्रमाण खूप कमी असल्याने हा उपलब्ध निधी खर्ची कसा पडेल, याची चिंता संबंधिताना लागून राहिली आहे. अर्थात, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने त्यानंतर नवीन कामांना मंजुरी मिळू शकणार नाही, असे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. अजूनही काही विभाग असे आहेत ज्यांनी प्रस्तावच पाठविलेले नाहीत, त्यामुळे ही भीती खरीच ठरण्याची चिन्हे आहेत. तेव्हा प्रस्ताव न पाठवून हाताची घडी घालून बसलेल्या स्वस्थाधिकाऱ्यांवर कुणी काही कारवाई करणार की नाही? जनता विकासासाठी आसुसलेली आहे, शासनानेही त्याकरिता योजना आखून निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु त्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे प्रस्ताव तयार करून ते वेळेत पाठविले जात नसतील तर संबंधितांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्या हाताची घडी सोडविणे गरजेचे आहे. अनेक प्रस्ताव येतात तर त्यात अपूर्णता असते. योजनेसाठीची तरतूद कमी व बजेट अधिक, असेही घडून येते. त्यामुळे फायलींचाच प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर सुरू राहतो. यातील दोषी हेरले जावयास हवे. कारण, आता मार्चअखेरीस घाईघाईत वर्कआॅर्डर काढल्या जातील तर कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होईल. अलीकडेच नियोजन समितीच्या एका कारकुनानेच खासदाराच्या नावाने प्रस्ताव करून मंजुºयाही घेऊन ठेवल्याचे आढळून आले होते, तशा प्रकारांना संधी मिळू नये म्हणून प्रस्तावांच्या पातळीवरील विलंब टाळला जाणे हाच यावरील उपाय ठरेल. त्याकरिता त्या त्या विभागांतर्गत जबाबदारीची निश्चिती होणे गरजेचे आहे. अन्यथा, दरवर्षाचे हेच आणि असेच घडून येण्याचे चक्र भेदता येणार नाही. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद