कालबाह्य रूढी परंपरा हे पारतंत्र्यच; चर्चासत्रातील सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:13+5:302021-09-02T04:30:13+5:30
जर या पारतंत्र्यामधून बाहेर पडायचे असेल तर त्यांना जागृत राहून स्वतःच मार्ग शोधावा लागेल, असे मत प्रतिपादन ग्लोबल व्हीजन ...

कालबाह्य रूढी परंपरा हे पारतंत्र्यच; चर्चासत्रातील सूर
जर या पारतंत्र्यामधून बाहेर पडायचे असेल तर त्यांना जागृत राहून स्वतःच मार्ग शोधावा
लागेल, असे मत प्रतिपादन ग्लोबल व्हीजन स्कूलच्या संचालिका विजयलक्ष्मी मणेरीकर यांनी प्रमुख वक्त्या म्हणून व्यक्त केले. तर स्वातंत्र्य रक्षणाची मोठी जबाबदारी महिलांवर असल्याचे मत आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोतर्फे आज़ादी का अमृत महोत्सवानिमित्त
आयोजित ‘स्त्री आणि स्वातंत्र्य‘ या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत हेात्या.
कारगिल युद्धात आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावणारे वीर सैनिक
नायक दीपचंद आणि माजी सैनिक विजय काटोरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्याच्या विषयावर आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सूत्र संचालन सीमा पेठकर यांनी केले. आभार
रश्मी हिरे बेंडाळे यांनी मानले. या वेळी भाजपाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे, महेश हिरे, नगरसेवक श्याम खोडे, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, छाया देवांग आदी उपस्थित होते.
---
छायाचित्र आर फोटोवर ३१पीआयबी नावाने...स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्राचे उदघाटन करताना सीमा हिरे, अलका आहेर, छाया देवांग तसेच विजयालक्ष्मी मणेरीकर, वीर सैनिक नायक दीपचंद व पराग मांदळे आदी.
310821\31nsk_16_31082021_13.jpg
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्राचे उदघाटन करताना सीमा हिरे, अलका आहेर, छाया देवांग तसेच विजयालक्ष्मी मणेरीकर, वीर सैनिक नायक दीपचंद व पराग मांदळे आदी