शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

वादग्रस्त ठेकेदाराकडून पोषण आहार पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:45 IST

सेंट्रल किचन’च्या निविदाप्रक्रियेत बड्या राजकीय नेते आणि ठेकेदारांना सोयीने दिलेले १३ ठेके दिल्याचे महासभेत आढळल्यानंतर हे सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी दिला. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही त्याच ठेकेदारांकडून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा सुरू आहे. महासभेकडून ठराव अप्राप्त असल्याचे निमित्त करून प्रशासन सोयीने त्याच ठेकेदारांकडून पुरवठा करून घेत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची मेहेरबानी : महासभेचा ठराव प्राप्त नसल्याचे निमित्त

नाशिक : ‘सेंट्रल किचन’च्या निविदाप्रक्रियेत बड्या राजकीय नेते आणि ठेकेदारांना सोयीने दिलेले १३ ठेके दिल्याचे महासभेत आढळल्यानंतर हे सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी दिला. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही त्याच ठेकेदारांकडून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा सुरू आहे. महासभेकडून ठराव अप्राप्त असल्याचे निमित्त करून प्रशासन सोयीने त्याच ठेकेदारांकडून पुरवठा करून घेत आहे.राज्य शासनाने सेंट्रल किचन योजना राबविण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचा संदर्भ घेऊन महापालिकेने गेल्या लोकसभा निवडणुकीत निविदाप्रक्रिया राबविली. त्यात ३३ पैकी १३ पुरवठादारांना ठेके दिले. त्यातील बरेच ठेकेदार हे अपात्र तर आहेत, परंतु पुरवठ्यातदेखील गोंधळ आहे. शासनाने जास्तीत जास्त पुरवठादार येतील अशाप्रकारे २० लाख रुपयांची किमान उलाढाल करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती चाळीस लाख करण्यात आली. अनेक कंपन्यांचे स्वतंत्र सेंट्रल किचन नाही तर काही जण उघड्यावरच अन्न शिजवत होते. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करून हवा बंद कंटेनरमधून अन्नाची वाहतूक करण्याची गरज असताना टेम्पो, रिक्षा अशा कोणत्याही साधनाने शाळांमध्ये भोजन पुरवठा सुरू होता. निविदाप्रक्रियेत गोंधळ तर होताच परंतु नंतरच्या सेवा बजावतानादेखील प्रचंड तक्रारी असूनही शिक्षण खात्याने डोळे झाक केली. त्यामुळे महासभेत हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी सेंट्रल किचनमधील गोंधळ एकेक करीत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी ‘सेंट्रल किचन’चे तेरा ठेके रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच यापुढील निविदाप्रक्रिया राबवितांना महिला बचत गटांना सामावून घेता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश दिले. महापौरांनी आदेश देऊन पंधरा दिवस होऊन गेले तरी महासभेचा ठराव प्राप्त नाही आणि पर्यायी सोय नसल्याच्या नावाखाली याच ठेकेदारांकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे प्रशासन एवढीमेहेरबानी या ठेकेदारांवर का दाखवित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.केवळ निविदाप्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतच गोंधळ नव्हे तर भोजन पुरवतानादेखील अनेक प्रकारचे गोंधळ झाले. यासंदर्भात शाळांनी लिखित स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. एका शाळेच्या भोजनात गोगलगाय आढळली तर काही ठिकाणी कर्मचारीच वेळेत जात नसल्याने शिक्षकांना भोजन वाटपाची कामे करावी लागली. अनेक शाळात मापात माप करून भोजनाची पुरवठा कमी करण्यात आला. खरा नफा अपुरे भोजन पुरवठ्यातच आहे, तसेही प्रकार झाले. शाळांनी यासंदर्भात लेखी तक्रार करूनही शिक्षण विभागाने संबंधितांचे ठेके रद्द का केले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता महासभेत ठराव झाल्यानंतरदेखील पुन्हा त्याच ठेकेदारांकडून भोजन पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :foodअन्न