कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 07:07 PM2018-10-12T19:07:00+5:302018-10-12T19:08:25+5:30

नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या ...

nsk,praksh,ambedkar,vanchint, bahujan, aaghadi | कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग

कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता शिबिरात प्रतिपादन

नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या विचाराला चालना देण्यासाठीच राजकीय निर्णय क्षमता निर्माण करणे अपेक्षित आहे. सत्तेचे लोकशाहीकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आताच कामाला लागले पाहिजे, असे प्रतिपादन बहुजन विकास वंचित आघाडीचे प्रणेते आणि भारिपचे राष्टÑीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
शहरातील औरंगाबादकर सभागृहात आयोजित बहुजन वंचित विकास आघाडीच्या उत्तर महाराष्टÑ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारिपचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शिवाजी ढेपले, अण्णासाहेब सूर्यवंशी, बाजीराव बोडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव, प्रभात सोनवणे, प्रा. किसन चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुका या वंचित बहुजन विकास आघाडीच्या बॅनरखालीच लढविल्या जातील. सत्ताकारणासाठीचे सकारात्मक चित्र आघाडीपुढे असले तरी सत्तेपेक्षाही आघाडीच्या माध्यमातून निर्णयक्षमता निर्माण करणारी ताकद गावपातळीपासून निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आघाडीबरोबर येणाºया अलुतेदार-बलुतेदारांनाबरोबर घेऊन जातांना कटुता टाळून संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर मतभेद होता कामा नये, असेही आंबेडकर म्हणाले.
वंचित आघाडीचे संघटन उभे करण्यासाठी निर्णय घेणारे पदाधिकारी, कार्यकर्ते निर्माण करण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरच पार पाडावी लागणार असून, यासाठी व्यापक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणाºया कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली पाहिजे. खुंटलेल्या राजकीय विचारांना मोकळे करण्याची जबाबदारी आता आघाडीच्या कार्यर्त्यांची असल्याचेही ते म्हणाले. बदल हा आता लगेचच घडेल असे नाही, परंतु पुढील निवडणुकीच्या वेळी मात्र नक्कीच परिवर्तन झालेले असेल असे आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रभात सोनवणे आणि शिवाजी ढेपले यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी विभागातून आलेल्या विविध समाजाच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना समाजाला प्रतिनिधित्व देण्याबरोबरच वंचित आघाडीसोबत असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी आभार मानले.

Web Title: nsk,praksh,ambedkar,vanchint, bahujan, aaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.