शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने पाण्याच्या टँकर्सची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:01 IST

नाशिक: जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाला सुरूवात झाली नसली तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या झळा काहीशा कमी झाल्या ...

ठळक मुद्देदिलादायक: टँकर्सची मागणी आणखी घटण्याची शक्यताअनेक टँकर्सची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता

नाशिक: जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाला सुरूवात झाली नसली तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या झळा काहीशा कमी झाल्या आहेत. जूनच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात ५६ टँकर्स सुरू होते आता केवळ ४० टॅकर्स सुरू असून येत्या काही दिवसात यातील अनेक टँकर्सची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्याला सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसलेल्या नाहीत. मागीलवर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे धरणांसह विहीरीही तुडूंब झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य फारसे जाणवले नाही. मात्र मे-जून या दोन महिन्यांत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर्सची मागणी वाढल्याने जूनच्या मध्यापर्यंत ६० पेक्षा अधिक गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. मान्सुनच्या आगमनापर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असल्यामुळे एप्रिलपर्यंत जिल्ह्यात पाण्याची अडचण निर्माण झाली नाही. पाण्याचा पुरेसा साठा असल्याने नियमित आवर्तन सोडण्याची देखील वेळ आली नाही. .जुनच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याने टँकर्स सुरू असलेल्या गावांना दिलासा मिळाला आहे. आता जिल्ह्यातील टँकर्सची मागणी १६ ने घटली असून सद्यस्थितीत ४० टँकर्सच सुरू आहेत. बागलाण तालुक्यात ६, चांदवड ४, देवळा ३, मालेगाव, ५, नांदगाव १, पेठ ७, सुरगाणा ५, तर येवला येथे ९ टँकर्स सुरू आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSuraj Mandhareसुरज मांढरे