शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:37 PM

नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देपाणीपट्टी वसुली : ग्रामपंचायतींकडे ११ कोटी थकीत

नाशिक : नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे या कर्मचाºयांनी आपण तांत्रिक कर्मचारी असून, पाणीपट्टी वसुलीचे आमचे काम नसल्याचा दावा करून, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा, दाभाडी व १२ गावे, देवळा व दहा गावे अशा तीन योजना राबविल्या जात असून, या तिन्ही योजनांपोटी ११ कोटी ३४ लाखांची पाणीपट्टी नांदगाव नगरपालिका, दाभाडी व देवळ्याच्या ज्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो त्यांच्याकडे थकली आहे. दरवर्षी थकबाकीची रक्कम वाढत जात असल्याने त्याचा बोजा जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून सात ते दहा कोटी या योजनेवर खर्च केले जातात, परंतु वसुली होत नसल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान होत असल्याची भावनासभेत सदस्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती.कर्मचाºयांचे जि.प. अध्यक्षांना निवेदनमंगळवारी कर्मचाºयांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन दिले असून, त्यात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन, व्हॉल्व्ह, एअर व्हॉल्व्ह व विविध कामांची देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम नियमित करीत आहेत. त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतींना वेळोवेळी भेट देत पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंचांना जाणीव करून दिले जाते. सदरचे कर्तव्य स्वत:हून बजावत असल्यामुळे वेतन कपात करू नये, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकzpजिल्हा परिषद