शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 19:12 IST

महापालिकेचा अल्टीमेटम : सहा कोटी रुपयांची वसुली

ठळक मुद्देबंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार१० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिला

नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.महापालिकेने करवसुलीसाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टी थकविणाऱ्या  ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील १० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिलेला आहे. सदर थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जे नळजोडणीधारक १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरणार नाहीत, अशा नळजोडणीधारकांची जोडणी बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत १९ कोटी ९७ लाख रुपये पाणीपट्टी वसूल केलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी २९ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे. सर्वाधिक पाणीपट्टीची वसुली सिडको विभागातून ४ कोटी ७८ लाख रुपये झाली आहे, तर सातपूर विभागातून २ कोटी ५ लाख, पश्चिममधून ३ कोटी, पूर्वमधून ३ कोटी ५१ लाख, पंचवटीतून २ कोटी ७१ लाख, नाशिकरोडमधून ३ कोटी ८९ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत अद्यापही असंख्य नळजोडणीधारकांना पाणीपट्टीची बिले जाऊन पोहोचलेली नाही. सुमारे वर्षभराच्या कालावधीत पाणीपट्टीची बिले न मिळाल्याने सोसायट्या, अपार्टमेंट यांना येणाऱ्या  बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे महापालिकेकडे त्याबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे.इन्फोमालमत्ता करात १२ कोटींनी वाढमहापालिकेने गत वर्षाच्या तुलनेत १२ कोटी ५८ लाख रुपये जास्त घरपट्टीची वसुली केली आहे. गतवर्षी सात महिन्यांत ४५ कोटी १८ लाख रुपये मालमत्ताकर वसूल झाला होता. यंदा सात महिन्यांत ५७ कोटी ७६ लाख रुपये वसुली झाली आहे. महापालिकेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेतूनच महापालिकेला ३४ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यानंतरच्या चार महिन्यांत महापालिकेने २३ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या  ७६४४ मिळकतधारकांना ७ लाख ८० हजारांची तर पाच, तीन आणि दोन या टक्केवारीतून ८९ लाख रुपये सवलत देण्यात आलेली आहे. ई पेमेंट करणाऱ्या  ४१ हजार ८२१ ग्राहकांना ६ लाख ४१ हजाराची सवलत देण्यात आलेली आहे.

टॅग्स :WaterपाणीTaxकर