शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
3
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
4
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
5
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
6
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
7
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
8
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
9
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
10
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
11
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
12
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
13
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
14
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
16
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
17
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
18
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
19
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
20
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी नको, पण आता रस्ता आवरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:32 IST

त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान सोडवून घेत असल्याने आता स्मार्ट सिटी नको, पण रस्त्याचे काम आवरा असे सांगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीला दिरंगाई : वारंवार मुदतवाढ देऊनही कामे अपूर्णच

नाशिक : त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान सोडवून घेत असल्याने आता स्मार्ट सिटी नको, पण रस्त्याचे काम आवरा असे सांगण्याची वेळ आली आहे.नाशिक शहरातील मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेला त्र्यंबक रोड ते अशोक स्तंभ अत्यंत चांगला रस्ता होता. खरे तर तो का फोडला आणि नूतनीकरणाचे घाटले याचे कारण अखेरपर्यंत कळले नाही. परंतु जुन्या गावठाणाला जोडणारा रस्ता स्मार्ट करण्याचे नियोजन होते असे सांगण्यात येते, परंतु असेच असेल तर शहरात असे अनेक रस्ते आहेत, जे गावठाणाला तर जोडले आहेच, शिवाय त्यांची दुरवस्थादेखील झाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने हे कोडे उलगडवले नाही तसेच त्याच्या खर्चाचे गणित कळेनासे झाले आहे. एक किलोमीटरसाठी थेट १७ कोटी रुपये करण्यात आल्याने शहरात अनेक कॉलनीरोड रखडलेले आहेत, किंवा खडीकरणदेखील झालेले नाही, मग केवळ याच रस्त्यासाठी इतका खर्च का केला जात आहे. शिवाय सतरा कोटी रुपयांता नक्की काय करणार आहेत याचा तपशीलदेखील बाहेर आलेला नाही.ठेकेदाराला वारंवार मुदत देऊनही तो काम पूर्ण करीत नसल्याने रस्त्याचे काम आणि बारा महिने थांब अशी प्रचिती येत आहे. अशीरेंगाळेली कामे स्मार्ट सिटीत होणार असतील तर त्यांना स्मार्ट का म्हणायचे किंबहूना आता स्मार्ट सिटी नको, पण रस्ता आवरा म्हणण्याची वेळ आली आहे.वर्षभरापासून रखडले कामसध्या या रस्त्यावरून वाद सुरू असून, रस्त्यामुळे सोडाच, परंतु रस्त्याकडे जाणारा सीबीएस मार्ग असो अथवा मेहेर या सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असून, त्यामुळे नागरिकांचे, शाळकरी मुले, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिकांबरोबरच स्थानिक रहिवासी अशा सर्वांचेच हाल होत आहे. परंतु त्यानंतरही महापालिका दखल घेण्यात तयार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी