शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

स्मार्ट सिटी नको, पण आता रस्ता आवरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:32 IST

त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान सोडवून घेत असल्याने आता स्मार्ट सिटी नको, पण रस्त्याचे काम आवरा असे सांगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीला दिरंगाई : वारंवार मुदतवाढ देऊनही कामे अपूर्णच

नाशिक : त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान सोडवून घेत असल्याने आता स्मार्ट सिटी नको, पण रस्त्याचे काम आवरा असे सांगण्याची वेळ आली आहे.नाशिक शहरातील मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेला त्र्यंबक रोड ते अशोक स्तंभ अत्यंत चांगला रस्ता होता. खरे तर तो का फोडला आणि नूतनीकरणाचे घाटले याचे कारण अखेरपर्यंत कळले नाही. परंतु जुन्या गावठाणाला जोडणारा रस्ता स्मार्ट करण्याचे नियोजन होते असे सांगण्यात येते, परंतु असेच असेल तर शहरात असे अनेक रस्ते आहेत, जे गावठाणाला तर जोडले आहेच, शिवाय त्यांची दुरवस्थादेखील झाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने हे कोडे उलगडवले नाही तसेच त्याच्या खर्चाचे गणित कळेनासे झाले आहे. एक किलोमीटरसाठी थेट १७ कोटी रुपये करण्यात आल्याने शहरात अनेक कॉलनीरोड रखडलेले आहेत, किंवा खडीकरणदेखील झालेले नाही, मग केवळ याच रस्त्यासाठी इतका खर्च का केला जात आहे. शिवाय सतरा कोटी रुपयांता नक्की काय करणार आहेत याचा तपशीलदेखील बाहेर आलेला नाही.ठेकेदाराला वारंवार मुदत देऊनही तो काम पूर्ण करीत नसल्याने रस्त्याचे काम आणि बारा महिने थांब अशी प्रचिती येत आहे. अशीरेंगाळेली कामे स्मार्ट सिटीत होणार असतील तर त्यांना स्मार्ट का म्हणायचे किंबहूना आता स्मार्ट सिटी नको, पण रस्ता आवरा म्हणण्याची वेळ आली आहे.वर्षभरापासून रखडले कामसध्या या रस्त्यावरून वाद सुरू असून, रस्त्यामुळे सोडाच, परंतु रस्त्याकडे जाणारा सीबीएस मार्ग असो अथवा मेहेर या सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असून, त्यामुळे नागरिकांचे, शाळकरी मुले, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिकांबरोबरच स्थानिक रहिवासी अशा सर्वांचेच हाल होत आहे. परंतु त्यानंतरही महापालिका दखल घेण्यात तयार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी