शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

...पण मोडला नाही रितेशचा कणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:47 IST

नाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.

ठळक मुद्देपुरात सारे वाहून गेले, तरीही जिद्दीच्या बळावर मिळवले तब्बल ९७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.ज्याच्या जिद्दीला सलाम करावा असाहा रितेश सीबीएसवरील डी. डी. बिटको स्कूलचा विद्यार्थी! कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच किंबहुना कठीणच. घरात लक्ष्मी नसली तरी सरस्वती मात्र नांदत आहे. कौटुंबिक परिस्थितीच्या जाणिवेतूनच रितेशने कष्टाने यश साध्य केले. त्याने दहावीच्या परीक्षेत ९७.५० टक्के इतके घवघवीत गुण मिळवले आहेत. रितेश पहिल्यापासूनच शाळेत अव्वल नंबर मिळवत आला. दहावीचे वर्ष हे महत्त्वाचे असल्याने त्याचा अभ्यास मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालायचा. घारपुरे घाट परिसरातील लहानशा घरात अभ्यास करताना परिसरातील गोंगाट चालायचा; परंतु सर्वाधिक त्रास गेल्या वर्षीच्या पुराचा झाला. गोदावरी नदीला आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुराने होते नव्हते वाहून गेले. वह्या-पुस्तके, दप्तर सर्व गेल्यानंतरदेखील त्याने जिद्द बाळगली. कॉलेजरोडला मावशीकडे एका छोट्या क्वॉर्टरमध्ये राहुन त्याने अभ्यास केला. विशेष म्हणजे कॉलेजरोडवरून पायपीट करीत सकाळी ७ वाजता सीबीएसला शाळेत आणि तेथून परत घरी. दीड वाजता घारपुरे घाटावर पुन्हा क्लासला पायीच आणि नंतर तेथून पुन्हा साडेचार वाजेनंतर घरी असा प्रवास रोजच केला.रात्री दोन- दोन वाजेपर्यंत अभ्यास करणाºया रितेशने अखेरीस त्याला हवे ते यश प्राप्त केले आणि तब्बल ९७.२० टक्के यश मिळवले. रितेशच्या यशाने कुटुंबीय भारावून गेले आहे. रितेशची मोठी बहीणदेखील शिक्षणात पुढे असून, ती सध्या अभियांत्रिकी पदवीच्या अखेरच्या वर्षाला आहे आता रितेशने पुढे एमबीए करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे हेच त्याने दाखवून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी