शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...पण मोडला नाही रितेशचा कणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:47 IST

नाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.

ठळक मुद्देपुरात सारे वाहून गेले, तरीही जिद्दीच्या बळावर मिळवले तब्बल ९७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.ज्याच्या जिद्दीला सलाम करावा असाहा रितेश सीबीएसवरील डी. डी. बिटको स्कूलचा विद्यार्थी! कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच किंबहुना कठीणच. घरात लक्ष्मी नसली तरी सरस्वती मात्र नांदत आहे. कौटुंबिक परिस्थितीच्या जाणिवेतूनच रितेशने कष्टाने यश साध्य केले. त्याने दहावीच्या परीक्षेत ९७.५० टक्के इतके घवघवीत गुण मिळवले आहेत. रितेश पहिल्यापासूनच शाळेत अव्वल नंबर मिळवत आला. दहावीचे वर्ष हे महत्त्वाचे असल्याने त्याचा अभ्यास मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालायचा. घारपुरे घाट परिसरातील लहानशा घरात अभ्यास करताना परिसरातील गोंगाट चालायचा; परंतु सर्वाधिक त्रास गेल्या वर्षीच्या पुराचा झाला. गोदावरी नदीला आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुराने होते नव्हते वाहून गेले. वह्या-पुस्तके, दप्तर सर्व गेल्यानंतरदेखील त्याने जिद्द बाळगली. कॉलेजरोडला मावशीकडे एका छोट्या क्वॉर्टरमध्ये राहुन त्याने अभ्यास केला. विशेष म्हणजे कॉलेजरोडवरून पायपीट करीत सकाळी ७ वाजता सीबीएसला शाळेत आणि तेथून परत घरी. दीड वाजता घारपुरे घाटावर पुन्हा क्लासला पायीच आणि नंतर तेथून पुन्हा साडेचार वाजेनंतर घरी असा प्रवास रोजच केला.रात्री दोन- दोन वाजेपर्यंत अभ्यास करणाºया रितेशने अखेरीस त्याला हवे ते यश प्राप्त केले आणि तब्बल ९७.२० टक्के यश मिळवले. रितेशच्या यशाने कुटुंबीय भारावून गेले आहे. रितेशची मोठी बहीणदेखील शिक्षणात पुढे असून, ती सध्या अभियांत्रिकी पदवीच्या अखेरच्या वर्षाला आहे आता रितेशने पुढे एमबीए करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे हेच त्याने दाखवून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी