शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST

खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्यिक मेळावा : जन्मगावाच्या वेदनांचा नवनाथ गोरे यांनी उलगडला प्रवास

नाशिक : खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.निमित्त होते, सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनाचे. उद्घाटन सत्रात गोरे यांची प्रकट मुलाखत मेळाव्याच्या अध्यक्ष व ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी घेतली. वेलणकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून गोरे यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात ‘फेसाटी’ या मथळ्यामागील पार्र्श्वभूमी सांगताना गोरे म्हणाले, राबराब राबून जेव्हा बैल थकतो तेव्हा त्याच्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागतो. २०१६सालापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातील निगडी खुर्द गावातील गावकरीदेखील काबाडकष्ट उपसत कर्जाचा डोंगर उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा मी मांडण्याचा प्रयत्न के ला, त्यामुळे ‘फेसाटी’ हा मथळा मला अधिक योग्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गावकऱ्यांची जिंदगी अस्मानी संकटाशी दोन हात करता करता सरत आहे. भारतात जरी दररोज बदल घडत असतील आणि नवनवे स्वप्न पूर्णत्वास जात असतील तरी माझ्या गावात आजही वीज ‘आकड्यां’मधून मिळवावी लागते. स्वातंत्र्यानंतर एकमेव बदल झालेला दिसतो तो म्हणजे आठ ते दहा कुटुंबांच्या घरी ‘टीव्ही’ आला. पाचवीलाच दुष्काळ पुजलेला असल्यामुळे तीस एकर जमिनीचा मालकदेखील कर्जबाजारी झाला आणि कर्जाचा डोंगर उतरविण्यासाठी त्याने हातात ऊसतोडीचा कोयता घेतला; मात्र आगाऊ रकमेची उचल असलेली मुद्दल फेडत व्याजरूपी कर्जाच्या रकमेत तो बुडत गेला. ही परिस्थिती आजही ‘जैसे-थे’ असल्याचे गोरे म्हणाले.जगण्याच्या ‘संघर्षा’ने सभागृह सुन्नबाभळीच्या कुंपणामधून वाट काढत माझ्या गावातील लोक जगण्याचा संघर्ष करताना आजही पहावयास मिळतात. नववीला असताना मुलीचे लग्न केले जाते आणि तीदेखील संसाराचा गाडा ओढण्यासाठी हातात कोयता घेत उसाच्या बागायती क्षेत्राकडे वळते. मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्टÑातील संघर्ष अन् काबाडकष्टाचा पट उलगडताना अवघे मु. शं. औरंगाबादकर सभागृह सुन्न झाले. सततच्या त्रासाची गावकºयांना इतकी सवय झाली की आता उद्रेकाची क्षमताही संपुष्टात आल्याची खंत गोरे यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्य