शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST

खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्यिक मेळावा : जन्मगावाच्या वेदनांचा नवनाथ गोरे यांनी उलगडला प्रवास

नाशिक : खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.निमित्त होते, सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनाचे. उद्घाटन सत्रात गोरे यांची प्रकट मुलाखत मेळाव्याच्या अध्यक्ष व ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी घेतली. वेलणकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून गोरे यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात ‘फेसाटी’ या मथळ्यामागील पार्र्श्वभूमी सांगताना गोरे म्हणाले, राबराब राबून जेव्हा बैल थकतो तेव्हा त्याच्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागतो. २०१६सालापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातील निगडी खुर्द गावातील गावकरीदेखील काबाडकष्ट उपसत कर्जाचा डोंगर उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा मी मांडण्याचा प्रयत्न के ला, त्यामुळे ‘फेसाटी’ हा मथळा मला अधिक योग्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गावकऱ्यांची जिंदगी अस्मानी संकटाशी दोन हात करता करता सरत आहे. भारतात जरी दररोज बदल घडत असतील आणि नवनवे स्वप्न पूर्णत्वास जात असतील तरी माझ्या गावात आजही वीज ‘आकड्यां’मधून मिळवावी लागते. स्वातंत्र्यानंतर एकमेव बदल झालेला दिसतो तो म्हणजे आठ ते दहा कुटुंबांच्या घरी ‘टीव्ही’ आला. पाचवीलाच दुष्काळ पुजलेला असल्यामुळे तीस एकर जमिनीचा मालकदेखील कर्जबाजारी झाला आणि कर्जाचा डोंगर उतरविण्यासाठी त्याने हातात ऊसतोडीचा कोयता घेतला; मात्र आगाऊ रकमेची उचल असलेली मुद्दल फेडत व्याजरूपी कर्जाच्या रकमेत तो बुडत गेला. ही परिस्थिती आजही ‘जैसे-थे’ असल्याचे गोरे म्हणाले.जगण्याच्या ‘संघर्षा’ने सभागृह सुन्नबाभळीच्या कुंपणामधून वाट काढत माझ्या गावातील लोक जगण्याचा संघर्ष करताना आजही पहावयास मिळतात. नववीला असताना मुलीचे लग्न केले जाते आणि तीदेखील संसाराचा गाडा ओढण्यासाठी हातात कोयता घेत उसाच्या बागायती क्षेत्राकडे वळते. मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्टÑातील संघर्ष अन् काबाडकष्टाचा पट उलगडताना अवघे मु. शं. औरंगाबादकर सभागृह सुन्न झाले. सततच्या त्रासाची गावकºयांना इतकी सवय झाली की आता उद्रेकाची क्षमताही संपुष्टात आल्याची खंत गोरे यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्य