शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST

खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्यिक मेळावा : जन्मगावाच्या वेदनांचा नवनाथ गोरे यांनी उलगडला प्रवास

नाशिक : खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.निमित्त होते, सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनाचे. उद्घाटन सत्रात गोरे यांची प्रकट मुलाखत मेळाव्याच्या अध्यक्ष व ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी घेतली. वेलणकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून गोरे यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात ‘फेसाटी’ या मथळ्यामागील पार्र्श्वभूमी सांगताना गोरे म्हणाले, राबराब राबून जेव्हा बैल थकतो तेव्हा त्याच्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागतो. २०१६सालापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातील निगडी खुर्द गावातील गावकरीदेखील काबाडकष्ट उपसत कर्जाचा डोंगर उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा मी मांडण्याचा प्रयत्न के ला, त्यामुळे ‘फेसाटी’ हा मथळा मला अधिक योग्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गावकऱ्यांची जिंदगी अस्मानी संकटाशी दोन हात करता करता सरत आहे. भारतात जरी दररोज बदल घडत असतील आणि नवनवे स्वप्न पूर्णत्वास जात असतील तरी माझ्या गावात आजही वीज ‘आकड्यां’मधून मिळवावी लागते. स्वातंत्र्यानंतर एकमेव बदल झालेला दिसतो तो म्हणजे आठ ते दहा कुटुंबांच्या घरी ‘टीव्ही’ आला. पाचवीलाच दुष्काळ पुजलेला असल्यामुळे तीस एकर जमिनीचा मालकदेखील कर्जबाजारी झाला आणि कर्जाचा डोंगर उतरविण्यासाठी त्याने हातात ऊसतोडीचा कोयता घेतला; मात्र आगाऊ रकमेची उचल असलेली मुद्दल फेडत व्याजरूपी कर्जाच्या रकमेत तो बुडत गेला. ही परिस्थिती आजही ‘जैसे-थे’ असल्याचे गोरे म्हणाले.जगण्याच्या ‘संघर्षा’ने सभागृह सुन्नबाभळीच्या कुंपणामधून वाट काढत माझ्या गावातील लोक जगण्याचा संघर्ष करताना आजही पहावयास मिळतात. नववीला असताना मुलीचे लग्न केले जाते आणि तीदेखील संसाराचा गाडा ओढण्यासाठी हातात कोयता घेत उसाच्या बागायती क्षेत्राकडे वळते. मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्टÑातील संघर्ष अन् काबाडकष्टाचा पट उलगडताना अवघे मु. शं. औरंगाबादकर सभागृह सुन्न झाले. सततच्या त्रासाची गावकºयांना इतकी सवय झाली की आता उद्रेकाची क्षमताही संपुष्टात आल्याची खंत गोरे यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्य