शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST

खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्यिक मेळावा : जन्मगावाच्या वेदनांचा नवनाथ गोरे यांनी उलगडला प्रवास

नाशिक : खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.निमित्त होते, सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनाचे. उद्घाटन सत्रात गोरे यांची प्रकट मुलाखत मेळाव्याच्या अध्यक्ष व ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी घेतली. वेलणकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून गोरे यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात ‘फेसाटी’ या मथळ्यामागील पार्र्श्वभूमी सांगताना गोरे म्हणाले, राबराब राबून जेव्हा बैल थकतो तेव्हा त्याच्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागतो. २०१६सालापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातील निगडी खुर्द गावातील गावकरीदेखील काबाडकष्ट उपसत कर्जाचा डोंगर उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा मी मांडण्याचा प्रयत्न के ला, त्यामुळे ‘फेसाटी’ हा मथळा मला अधिक योग्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गावकऱ्यांची जिंदगी अस्मानी संकटाशी दोन हात करता करता सरत आहे. भारतात जरी दररोज बदल घडत असतील आणि नवनवे स्वप्न पूर्णत्वास जात असतील तरी माझ्या गावात आजही वीज ‘आकड्यां’मधून मिळवावी लागते. स्वातंत्र्यानंतर एकमेव बदल झालेला दिसतो तो म्हणजे आठ ते दहा कुटुंबांच्या घरी ‘टीव्ही’ आला. पाचवीलाच दुष्काळ पुजलेला असल्यामुळे तीस एकर जमिनीचा मालकदेखील कर्जबाजारी झाला आणि कर्जाचा डोंगर उतरविण्यासाठी त्याने हातात ऊसतोडीचा कोयता घेतला; मात्र आगाऊ रकमेची उचल असलेली मुद्दल फेडत व्याजरूपी कर्जाच्या रकमेत तो बुडत गेला. ही परिस्थिती आजही ‘जैसे-थे’ असल्याचे गोरे म्हणाले.जगण्याच्या ‘संघर्षा’ने सभागृह सुन्नबाभळीच्या कुंपणामधून वाट काढत माझ्या गावातील लोक जगण्याचा संघर्ष करताना आजही पहावयास मिळतात. नववीला असताना मुलीचे लग्न केले जाते आणि तीदेखील संसाराचा गाडा ओढण्यासाठी हातात कोयता घेत उसाच्या बागायती क्षेत्राकडे वळते. मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्टÑातील संघर्ष अन् काबाडकष्टाचा पट उलगडताना अवघे मु. शं. औरंगाबादकर सभागृह सुन्न झाले. सततच्या त्रासाची गावकºयांना इतकी सवय झाली की आता उद्रेकाची क्षमताही संपुष्टात आल्याची खंत गोरे यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्य