शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उत्तर महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे; पाच जिल्ह्यांत पाच हजार रुग्णांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 01:03 IST

सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या नाशिक जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत ९५ हजार ३५१ रुग्ण आढळले.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, हे प्रमाण आता ९५.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्रात दोन लाख २६ हजार ७६९ पैकी दोन लाख १७ हजार ३१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने घरी परतले आहेत. सध्या या पाचही जिल्ह्याात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजार ८१ इतकी आहे.

सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या नाशिक जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत ९५ हजार ३५१ रुग्ण आढळले. त्यापैकी ९० हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत १,६९९ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार ८५६ रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्याात ५७ हजार ८५५ रुग्ण आढळले असून त्यातील ५५ हजार ९११ रुग्ण करोनामुक्त झाले. तर ८७९ जणांचा मृत्यू झाला. सध्या १ हजार ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या ५३ हजार ५३४ रुग्णांपैकी पैकी ५१ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात १ हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ६२३ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५९६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १२ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या २८६ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या सहा हजार ४३३ रुग्णांपैकी सहा हजार ३९ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आणि १४३ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक