शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

प्यायलाच नाही पाणी, तेथे हात धुणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:57 IST

नांदूरवैद्य : एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा दरवर्षीप्रमाणे पोहोचत आहेत.

नांदूरवैद्य :(किसन काजळे ) एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा दरवर्षीप्रमाणे पोहोचत आहेत. धरणांचा तालुका आणि निम्म्या महाराष्ट्राची तहान भागविणारा तालुका म्हणून परिचित असणाºया इगतपुरी तालुक्यावरच पिण्यासाठी पाणी शोधण्याची केविलवाणी वेळ आली आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात तर नागरिक बैलगाडीच्या साहाय्याने पाण्याचे बॅरल ठेवून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून पाणी आणत आहेत.इ गतपुरी येथील कथृवांगण पाड्यातील आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच असून, येथील महिलांना चक्क जीव धोक्यात घालून रेल्वे लाइन ओलांडत पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.दिवसेंदिवस राज्यात कोरोना- बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन स्वच्छतेचा मंत्र जपतानाच सतत हात धुण्याच्या सूचना करीत आहेत, पण जेथे पिण्याच्या पाण्याची मारामार तेथे हात धुवायला पाणी कुठून आणणार, असा प्रश्न आहे. एक घोट पाणीसुद्धा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे. कथृवांगण पाडा इगतपुरी नगर परिषद हद्दीत येतो. सुमारे २५ वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगर परिषदेत करण्यात आला, परंतु परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. या पाड्यात एकूण ४५ घरे आहेत. ज्यात जवळजवळ २०० लोक वस्ती करून राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगर परिषदेने पाच वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकीत हे पाणी साठविले जाते. आठवड्यात दोन वेळा जास्तीत जास्त २० मिनिटे पाणीपुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. सध्या ते ही एकदाच मिळत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या तहसीलदार यांनी धानोशी, मायदरा, अवनखेड आदी ठिकाणी दोन टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवले असून, लवकरच नागरिकांना पाणी मिळेल, अशी आश्वासने दिली जात आहेत.-------------------------------------------फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारातालुक्यातील नांदूरवैद्य येथेही दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन नवीन विहिरीचे खोदकाम करण्याआधी करायला पाहिजे होते असे नागरिकांनी सांगितले. परंतु खोदकाम करण्याआधी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीही उपाययोजना न करता तसेच ग्रामस्थांची बैठक न घेता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली. त्यामुळे आज कोरोनाचे संकट आणि पाणीटंचाई असा दुहेरी संकटांचा सामना नांदूरवैद्य येथील नागरिकांना करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत दारणा नदीवरून मुख्य पाइपलाइनला पाइप जोडून वापरासाठी पाणी येणार होते, परंतु त्यासही विलंब होत असल्यामुळे अजून किती दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार असा सवाल नागरिक विचारीत आहेत.-----------------------------१ इगतपुरीजवळील कथृवांगण पाड्यातील आदिवासी महिलांना रेल्वेचे रूळ ओलांडत पाणी आणण्यासाठी धोक्याची कसरत करावी लागत आहे.२ इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बैलगाडीच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणावे लागत आहे.३ नांदूरवैद्य येथील पाणीपुरवठा करणाºया नवीन टाकीचे बांधकाम लॉकडाउनमुळे रखडले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक