शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

प्यायलाच नाही पाणी, तेथे हात धुणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:57 IST

नांदूरवैद्य : एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा दरवर्षीप्रमाणे पोहोचत आहेत.

नांदूरवैद्य :(किसन काजळे ) एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा दरवर्षीप्रमाणे पोहोचत आहेत. धरणांचा तालुका आणि निम्म्या महाराष्ट्राची तहान भागविणारा तालुका म्हणून परिचित असणाºया इगतपुरी तालुक्यावरच पिण्यासाठी पाणी शोधण्याची केविलवाणी वेळ आली आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात तर नागरिक बैलगाडीच्या साहाय्याने पाण्याचे बॅरल ठेवून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून पाणी आणत आहेत.इ गतपुरी येथील कथृवांगण पाड्यातील आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच असून, येथील महिलांना चक्क जीव धोक्यात घालून रेल्वे लाइन ओलांडत पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.दिवसेंदिवस राज्यात कोरोना- बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन स्वच्छतेचा मंत्र जपतानाच सतत हात धुण्याच्या सूचना करीत आहेत, पण जेथे पिण्याच्या पाण्याची मारामार तेथे हात धुवायला पाणी कुठून आणणार, असा प्रश्न आहे. एक घोट पाणीसुद्धा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे. कथृवांगण पाडा इगतपुरी नगर परिषद हद्दीत येतो. सुमारे २५ वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगर परिषदेत करण्यात आला, परंतु परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. या पाड्यात एकूण ४५ घरे आहेत. ज्यात जवळजवळ २०० लोक वस्ती करून राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगर परिषदेने पाच वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकीत हे पाणी साठविले जाते. आठवड्यात दोन वेळा जास्तीत जास्त २० मिनिटे पाणीपुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. सध्या ते ही एकदाच मिळत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या तहसीलदार यांनी धानोशी, मायदरा, अवनखेड आदी ठिकाणी दोन टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवले असून, लवकरच नागरिकांना पाणी मिळेल, अशी आश्वासने दिली जात आहेत.-------------------------------------------फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारातालुक्यातील नांदूरवैद्य येथेही दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन नवीन विहिरीचे खोदकाम करण्याआधी करायला पाहिजे होते असे नागरिकांनी सांगितले. परंतु खोदकाम करण्याआधी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीही उपाययोजना न करता तसेच ग्रामस्थांची बैठक न घेता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली. त्यामुळे आज कोरोनाचे संकट आणि पाणीटंचाई असा दुहेरी संकटांचा सामना नांदूरवैद्य येथील नागरिकांना करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत दारणा नदीवरून मुख्य पाइपलाइनला पाइप जोडून वापरासाठी पाणी येणार होते, परंतु त्यासही विलंब होत असल्यामुळे अजून किती दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार असा सवाल नागरिक विचारीत आहेत.-----------------------------१ इगतपुरीजवळील कथृवांगण पाड्यातील आदिवासी महिलांना रेल्वेचे रूळ ओलांडत पाणी आणण्यासाठी धोक्याची कसरत करावी लागत आहे.२ इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बैलगाडीच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणावे लागत आहे.३ नांदूरवैद्य येथील पाणीपुरवठा करणाºया नवीन टाकीचे बांधकाम लॉकडाउनमुळे रखडले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक