शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ना उद्घाटक निश्चित, ना निमंत्रण पत्रिका; साहित्य संमेलन अवघ्या तीन आठवड्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 08:25 IST

संमेलनाला अवघे २१ दिवस बाकी असताना अजूनही संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाच जाहीर झालेली नसल्याने साहित्य रसिकदेखील संभ्रमात आहेत.

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. असे असले तरी अद्यापही संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव निश्चित झालेले नाही. संमेलनाच्या तिन्ही दिवसांची रूपरेषा असणारी कार्यक्रम पत्रिका, मान्यवर साहित्यिक आणि अन्य   निमंत्रितांना देण्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेचेही काम प्रलंबित आहे. या बाबींना लागत असलेल्या विलंबाबाबत आयोजकदेखील लवकरच जाहीर करण्यात येईल, यापलीकडे काहीही सांगण्यास तयार नाहीत.   

संमेलनाला अवघे २१ दिवस बाकी असताना अजूनही संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाच जाहीर झालेली नसल्याने साहित्य रसिकदेखील संभ्रमात आहेत. महामंडळाकडून उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावावर अद्यापही खलच सुरू असल्याने संमेलनाच्या दिवसापर्यंत घोळ सुरूच राहणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

मान्यवरांना निमंत्रण कधी?

निमंत्रण पत्रिकेचे काम लांबणीवर पडले असल्याने त्या निमंत्रण पत्रिका आयोजकांकडून मान्यवरांना स्वहस्ते नेऊन देण्याची परंपरादेखील खंडित होण्याची चिन्हे आहेत. केवळ समाजमाध्यमांचा वापर करून त्या निमंत्रण पत्रिका दिल्या जातील. मात्र, मान्यवरांना अशाप्रकारे निमंत्रण दिल्यास संबंधित मान्यवर संमेलनाला येण्याची शक्यताच कमी होते, हे भान आयोजकांना ठेवावे लागणार आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र