शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:59 IST

पाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.

ठळक मुद्देपाटोदा : शेतकरी एल्गार परिषदेत ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.राज्यात परतीच्या पावसाने संपूर्ण शेतीचे स्मशान झाले असून, शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात शर्ती घातल्याने अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार असल्याने शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. राज्यात मागील वर्षाचा दुष्काळ आणि यंदाच्या परतीच्या पावसाने शेतक्यांच्या हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पाश्वभूमीवर होऊ घातलेल्या आॅक्टोबर मार्च महिन्यातील इ. दहावी, बारावीच्या परीक्षांसह डिग्री, पदवी पदवीत्त्युर परीक्षांची फी राज्य शासनाने माफ करावी, अशी मागणी शेतकरी एल्गार परिषदेचे संयोजक, शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांनी यावेळी केली.यावेळी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, सूर्यभान नाईकवाडे आदींनी या परिषदेला मार्गदशन केले.शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, शेतीसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, संपूर्ण कर्ज माफी करावी यासह विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी जाफर पठाण, रमेश बोरणारे, प्रभाकर बोरनारे, साहेबराव आहेर, विलास पवार, उस्मान शेख, मारु ती घोरपडे, कैलास नाईकवाडे, रघुनाथ नाईकवाडे, भास्कर बोराडे, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो ०५ पाटोदा)मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने काही शेतकºयांनी शेतातील नुकसान झालेली पिके जमा करून खळ्यावर जमा करून ठेवली अशा शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत माणूस मेल्यावर मढ किती दिवस झाकून ठेवायचा, असा संतप्त सवाल शेतकºयांनी या परिषदेत उपस्थित करीत शासनाचा निषेध केला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी