शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:59 IST

पाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.

ठळक मुद्देपाटोदा : शेतकरी एल्गार परिषदेत ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.राज्यात परतीच्या पावसाने संपूर्ण शेतीचे स्मशान झाले असून, शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात शर्ती घातल्याने अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार असल्याने शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. राज्यात मागील वर्षाचा दुष्काळ आणि यंदाच्या परतीच्या पावसाने शेतक्यांच्या हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पाश्वभूमीवर होऊ घातलेल्या आॅक्टोबर मार्च महिन्यातील इ. दहावी, बारावीच्या परीक्षांसह डिग्री, पदवी पदवीत्त्युर परीक्षांची फी राज्य शासनाने माफ करावी, अशी मागणी शेतकरी एल्गार परिषदेचे संयोजक, शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांनी यावेळी केली.यावेळी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, सूर्यभान नाईकवाडे आदींनी या परिषदेला मार्गदशन केले.शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, शेतीसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, संपूर्ण कर्ज माफी करावी यासह विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी जाफर पठाण, रमेश बोरणारे, प्रभाकर बोरनारे, साहेबराव आहेर, विलास पवार, उस्मान शेख, मारु ती घोरपडे, कैलास नाईकवाडे, रघुनाथ नाईकवाडे, भास्कर बोराडे, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो ०५ पाटोदा)मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने काही शेतकºयांनी शेतातील नुकसान झालेली पिके जमा करून खळ्यावर जमा करून ठेवली अशा शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत माणूस मेल्यावर मढ किती दिवस झाकून ठेवायचा, असा संतप्त सवाल शेतकºयांनी या परिषदेत उपस्थित करीत शासनाचा निषेध केला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी