शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगेचे पाणी  अडविल्यास धरणे भरतील :  नितीन गडकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 02:05 IST

नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि पाण्यावरून होणारी भांडणे होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नाशिक : नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि पाण्यावरून होणारी भांडणे होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.  के.के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कर्मयोगी आणि कृषी तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल अहेर, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नीलिमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी गडकरी म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील पाणी हे समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडवून ठाणे जिल्ह्यात धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे धरण बांधण्यासाठी ३० हजार कोटींचा खर्च येणार असून, ९० टक्के खर्च करण्याची तयारी केंद्राने दर्शविली आहे. ठाणे जिल्ह्यात धरण बांधल्यामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडी धरणदेखील भरले जाईल त्यामुळे पाण्यावरून निर्माण होणारे वाद होणार नाहीत.नाशिक, अहमदनगर येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नर्मदा या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, १ लाख कोटी रुपये सिंचनासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, असे गडकरी यांनी म्हणाले. निफाड येथे ड्रायपोर्टला मंजुरी मिळाली असल्याचे सांगून विक्र ीकरावरून प्रकरण अडले असल्याने राज्य सरकारने तोडगा काढल्यास नाशिकच्या शेतकऱ्यांना द्राक्षे, कांद्याच्या आयात-निर्यातीसाठी मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले. शिक्षणसंस्थांनी आता व्यावसायिक तसेच तांत्रिक शिक्षण देण्याबरोबरच संशोधनात्मक शिक्षणावर भर देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. शिक्षणसंस्था चालकांनी चांगले नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिक्षणसंस्थांपुढील अडचणी सांगून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती शासनाकडून देण्यास विलंब होत असल्याचे म्हटले. प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी प्रास्ताविक केले.कर्मयोगी, कृषितपस्वी पुरस्कारांचे वितरणकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात योगदान देणारे सनदी अधिकारी पुण्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांना ‘कृषितपस्वी’, तर घरकुल परिवार संस्थेच्या अध्यक्ष विद्या फडके यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रु पये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. शेखर गायकवाड परदेशात असल्याने त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला.शब्द पाळा, गडकरींचा आदर्श घ्याया सोहळ्यात के. के. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी व्यासपीठावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावले. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही दिलेली नाही अशी आठवण करून देत केंद्रीय मंत्री गडकरी यांचा आदर्श घ्या असा सल्ला महाजन यांना दिला. त्यानंतर भाषणासाठी उठलेले महाजन यांनी वाघ यांना आपल्यासारख्या मोठ्या संस्थाचालकांनी ठरविले तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ शकता, त्यासाठी शासनावर अवलंबून राहाण्याची गरज नसल्याचे सांगितले.

टॅग्स :DamधरणRainपाऊसWaterपाणीNitin Gadkariनितीन गडकरी