शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

मनपाच्या शाळा डिजीटल नव्हे सुरक्षीत करण्याची गरज

By संजय पाठक | Updated: August 3, 2019 15:40 IST

नाशिक- शहरातील दोन शाळांमध्ये दोन मुलांचा अपघाती मृत्यू घटना घडल्या आणि सर्वांनाच हळहळ वाटली. परंतु त्याच बरोबर शाळांची अनास्था तसेच मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. महापालिकेच्या वतीने तातडीने मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मुलांच्या सुरक्षीततेविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर हीच खरी गरज आहे. सध्या शाळांमध्ये डिजीटल क्रांती करण्याची महापालिकेची हौस सुरू आहे. माजी आयुक्तांनी तर त्यासाठी तब्बल ११ कोटी रूपयांची तरतूद देखील होती. परंतु सर्वच विषय पडताळणी केली तर महापालिकेच्या किंवा खासगी शाळा देखील डिजीटल पेक्षा आधी सुरक्षीत करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देशाळेत प्रसाधनगृहाची सोय नाहीलघुशंकेसाठी जाताना विद्यार्थ्याचा मृत्यू होणे खेदजनक

संजय पाठक, नाशिक- शहरातील दोन शाळांमध्ये दोन मुलांचा अपघाती मृत्यू घटना घडल्या आणि सर्वांनाच हळहळ वाटली. परंतु त्याच बरोबर शाळांची अनास्था तसेच मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. महापालिकेच्या वतीने तातडीने मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मुलांच्या सुरक्षीततेविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर हीच खरी गरज आहे. सध्या शाळांमध्ये डिजीटल क्रांती करण्याची महापालिकेची हौस सुरू आहे. माजी आयुक्तांनी तर त्यासाठी तब्बल ११ कोटी रूपयांची तरतूद देखील होती. परंतु सर्वच विषय पडताळणी केली तर महापालिकेच्या किंवा खासगी शाळा देखील डिजीटल पेक्षा आधी सुरक्षीत करण्याची गरज आहे.विशेषत: शाळेच्या इमारतीत प्रसाधन गृह नसल्याने विद्यार्थ्याला लघुशंकेसाठी वर्गाबाहेर जावे लागत असेल आणि त्यावेळी खडड्यात पडून मृत्यू होत असेल तर गरज डिजीटलची आहे की सुरक्षीता आणि शाळेत मुलभूत सुविधांची याचा विचारच करायला हवा.गेल्याच आठवड्यात दोन गंभीर घटनांनी पालकवर्ग अस्वस्थ झाला. मराठा हायस्कुलमध्ये सातवीच्या वर्गात कपाट पडून वर्गातच मधल्या सुटीत खेळणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला तर दुसºया घटनेत आंनदवल्ली जवळ असलेल्या काळे नगरात मुलगा घरासाठी खोदलेल्या खड्यात पडून बुडला. दोन्ही घटना हृदयद्रावक होत्या त्याची शिक्षणाधिकारी देवीदास महाजन तसेच शिक्षण समितीने यथायोग्य दखल घेतली. तथापि, याबाबत केवळ महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. खासगी शाळात सुरक्षीतता घेण्याची गरज नाही काय असाही त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला. अर्थात, खासगी आणि मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये काही घडले तर ते फारसे चर्चेत येत नाही. परंतु महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की, लगोलग सर्वच कारवाईला तयार होतात. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या शाळांपासूनच काळजी घ्यायला सुरवात केली तर गैर नाही मात्र सुरक्षीततेची नियमावली सर्वांनाच असायला हवी.खासगी शाळांमध्ये विशेषत: इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षेची खास व्यवस्था असते. मुलांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तसेच सुरक्षा कर्मचारी देखील असतात. परंतु महापालिकांच्या शाळांमध्ये तशी सोयच नसते. येथे दोन वर्षांपासून बसविलेल्या सीसीटीव्हीच गायब झाले तसे खासगी शाळेत होत नाही कारण उत्तरदायित्व असते. महापालिका शाळेत सुरक्षा कर्मचारी हा प्रकार दुरच कामाठी आणि क्लर्क देखील एकच असतो. या दृष्टीने महापालिकेचा विचार होत नाही. महापालिकेच्या शाळा या खासगी शाळांना स्पर्धा करणाºया असल्या पाहिजे यासाठी तशा भौतिक सुविधा आणि सुरक्षीतत आणि मग शिक्षणाचा दर्जा या सर्वच बाबी असल्या पाहीजे. यापूर्वी ई लर्निंगचा फंडा सर्व शाळेत राबविण्यात आला. त्यातील किती चालू किती बंद हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्यानंतर माजी आयुक्तांनी शाळेसाठी तब्बल ११ कोटी रूपये खर्च करून डिजीटल स्कूल योजना आखली होती. नव्या आयुक्तांनी ती फिरवली. शाळा डिजीटल होऊ नये काय तर व्हाव्यात परंतु आधी शाळात सुरक्षीतता आणि भौतिक सुविधा हव्यात. लघुशंकेसाठी मुलाला बाहेर जावे लागले आणि त्याठिकाणी जात असताना खड्डयात पडून मृत्यू झाला असेल तर अधिक गंभीर बाब आहे. शाळेच्या आवारात प्रसाधन गृहही बांधु शकत नसेल किंंवा शाळांना संरक्षक भिंत नसेल तर डिजीटल शाळांचे काय स्वप्न बाळगु शकतो.एखादी दुर्घटना घडली की त्यावर चर्चा करायची, लगेचच उपाययोजना करायची किंवा नियमावलीची घोषणा करायची हे सर्रास घडते आहे. त्यात गैर नाही परंतु घटनेची तीव्रता कमी झाली की पुन्हा सर्व कारभार सैरभैर असे होऊ नये हीच अपेक्षा

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण