शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मनपाच्या शाळा डिजीटल नव्हे सुरक्षीत करण्याची गरज

By संजय पाठक | Updated: August 3, 2019 15:40 IST

नाशिक- शहरातील दोन शाळांमध्ये दोन मुलांचा अपघाती मृत्यू घटना घडल्या आणि सर्वांनाच हळहळ वाटली. परंतु त्याच बरोबर शाळांची अनास्था तसेच मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. महापालिकेच्या वतीने तातडीने मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मुलांच्या सुरक्षीततेविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर हीच खरी गरज आहे. सध्या शाळांमध्ये डिजीटल क्रांती करण्याची महापालिकेची हौस सुरू आहे. माजी आयुक्तांनी तर त्यासाठी तब्बल ११ कोटी रूपयांची तरतूद देखील होती. परंतु सर्वच विषय पडताळणी केली तर महापालिकेच्या किंवा खासगी शाळा देखील डिजीटल पेक्षा आधी सुरक्षीत करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देशाळेत प्रसाधनगृहाची सोय नाहीलघुशंकेसाठी जाताना विद्यार्थ्याचा मृत्यू होणे खेदजनक

संजय पाठक, नाशिक- शहरातील दोन शाळांमध्ये दोन मुलांचा अपघाती मृत्यू घटना घडल्या आणि सर्वांनाच हळहळ वाटली. परंतु त्याच बरोबर शाळांची अनास्था तसेच मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. महापालिकेच्या वतीने तातडीने मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मुलांच्या सुरक्षीततेविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर हीच खरी गरज आहे. सध्या शाळांमध्ये डिजीटल क्रांती करण्याची महापालिकेची हौस सुरू आहे. माजी आयुक्तांनी तर त्यासाठी तब्बल ११ कोटी रूपयांची तरतूद देखील होती. परंतु सर्वच विषय पडताळणी केली तर महापालिकेच्या किंवा खासगी शाळा देखील डिजीटल पेक्षा आधी सुरक्षीत करण्याची गरज आहे.विशेषत: शाळेच्या इमारतीत प्रसाधन गृह नसल्याने विद्यार्थ्याला लघुशंकेसाठी वर्गाबाहेर जावे लागत असेल आणि त्यावेळी खडड्यात पडून मृत्यू होत असेल तर गरज डिजीटलची आहे की सुरक्षीता आणि शाळेत मुलभूत सुविधांची याचा विचारच करायला हवा.गेल्याच आठवड्यात दोन गंभीर घटनांनी पालकवर्ग अस्वस्थ झाला. मराठा हायस्कुलमध्ये सातवीच्या वर्गात कपाट पडून वर्गातच मधल्या सुटीत खेळणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला तर दुसºया घटनेत आंनदवल्ली जवळ असलेल्या काळे नगरात मुलगा घरासाठी खोदलेल्या खड्यात पडून बुडला. दोन्ही घटना हृदयद्रावक होत्या त्याची शिक्षणाधिकारी देवीदास महाजन तसेच शिक्षण समितीने यथायोग्य दखल घेतली. तथापि, याबाबत केवळ महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. खासगी शाळात सुरक्षीतता घेण्याची गरज नाही काय असाही त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला. अर्थात, खासगी आणि मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये काही घडले तर ते फारसे चर्चेत येत नाही. परंतु महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की, लगोलग सर्वच कारवाईला तयार होतात. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या शाळांपासूनच काळजी घ्यायला सुरवात केली तर गैर नाही मात्र सुरक्षीततेची नियमावली सर्वांनाच असायला हवी.खासगी शाळांमध्ये विशेषत: इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षेची खास व्यवस्था असते. मुलांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तसेच सुरक्षा कर्मचारी देखील असतात. परंतु महापालिकांच्या शाळांमध्ये तशी सोयच नसते. येथे दोन वर्षांपासून बसविलेल्या सीसीटीव्हीच गायब झाले तसे खासगी शाळेत होत नाही कारण उत्तरदायित्व असते. महापालिका शाळेत सुरक्षा कर्मचारी हा प्रकार दुरच कामाठी आणि क्लर्क देखील एकच असतो. या दृष्टीने महापालिकेचा विचार होत नाही. महापालिकेच्या शाळा या खासगी शाळांना स्पर्धा करणाºया असल्या पाहिजे यासाठी तशा भौतिक सुविधा आणि सुरक्षीतत आणि मग शिक्षणाचा दर्जा या सर्वच बाबी असल्या पाहीजे. यापूर्वी ई लर्निंगचा फंडा सर्व शाळेत राबविण्यात आला. त्यातील किती चालू किती बंद हा संशोधनाचा विषय आहे. परंतु त्यानंतर माजी आयुक्तांनी शाळेसाठी तब्बल ११ कोटी रूपये खर्च करून डिजीटल स्कूल योजना आखली होती. नव्या आयुक्तांनी ती फिरवली. शाळा डिजीटल होऊ नये काय तर व्हाव्यात परंतु आधी शाळात सुरक्षीतता आणि भौतिक सुविधा हव्यात. लघुशंकेसाठी मुलाला बाहेर जावे लागले आणि त्याठिकाणी जात असताना खड्डयात पडून मृत्यू झाला असेल तर अधिक गंभीर बाब आहे. शाळेच्या आवारात प्रसाधन गृहही बांधु शकत नसेल किंंवा शाळांना संरक्षक भिंत नसेल तर डिजीटल शाळांचे काय स्वप्न बाळगु शकतो.एखादी दुर्घटना घडली की त्यावर चर्चा करायची, लगेचच उपाययोजना करायची किंवा नियमावलीची घोषणा करायची हे सर्रास घडते आहे. त्यात गैर नाही परंतु घटनेची तीव्रता कमी झाली की पुन्हा सर्व कारभार सैरभैर असे होऊ नये हीच अपेक्षा

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण