शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोरोना विरूध्द राजकारणविरहीत लढा देण्याची गरज !

By संजय पाठक | Updated: April 8, 2021 17:11 IST

नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापालिकेत सत्ता कोणाची हे बघून आरोप प्रत्याराेप हेात असतील, हे राजकीय शहाणपण नाही असे म्हणावे लागेल.  

ठळक मुद्देनिवडणूका होतच राहतील  आरोप प्रत्यारोपापेक्षा सहकार्य महत्वाचे

नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापालिकेत सत्ता कोणाची हे बघून आरोप प्रत्याराेप हेात असतील, हे राजकीय शहाणपण नाही असे म्हणावे लागेल.  

महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे राजकारण होणे अपेक्षीत आहे परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि महापालिकेत भाजपची सत्ता यामुळे कोणत्याही त्रूटी आणि उणिवा शाेधून राजकारण करणे आलेच. शिवसेना त्यातून आरोप प्रत्यारोप करते तर कधी मनसे प्रश्न उपस्थित करते असे बहुतांश जाणवतच आहे. गुरूवारीही शिवसेनेच्या ज्येेष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी नाशिकरोड येथील बिटकेा रूग्णालयात सुविधा नाहीत म्हणून आंदोलने केले.

खरे तर कोरोना हा विषय एकट्या महापौर सतीश कुलकर्णी  किंवा भाजपा अथवा प्रशासनाचा नाही. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने त्यांचाच हा विषय आहे असे नाही अनेक यंत्रणा, खासगी रूग्णालय, आरोग्य क्षेत्राला पुरक उद्याेग त्यांच्याकडून होणारा पुरवठा असा एकात एक गुंतलेला विषय आहे. त्यामुळे कोरेाना सारख्या आपत्तीला एकत्रीत सामोरे जाणे आवश्यक आहे. तसे हेाताना दिसत नाही.महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांना कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही अशी विरोधकांनी टीका करायची आणि राज्याकडून मदत मिळत नाही म्हणून भाजपानेशिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करायची असा हा प्रकार सुरू आहे.

शहरातील नागरीकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना उणिवा शोधण्यात नव्हे तर आता संकट काळात आधार देणाऱ्यांची गरज आहे. आता एकेका घरात अनेक जण बाधीत असल्याने त्यांना बेड तर मिळत नाहीच शिवाय अन्य अनेक अडचणी उभ्या आहेत. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा अशा नागरीकांना मदत करणे हे महत्वाचे आहे. मग भलेही त्याचा वापर श्रेयासाठी झाला तरी चालेल. वादापेक्षा हे परवडले अशी स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण