शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

उद्योग, शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:02 IST

उद्योग व शैक्षणिक संस्थांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देई. वायुनंदन : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभ

नाशिकरोड : उद्योग व शैक्षणिक संस्थांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभाप्रसंगी बोलताना वायुनंदन म्हणाले की, शैक्षणिक अर्हतेसोबत उद्योग क्षेत्रास लागणारे विविध कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता शैक्षणिक संस्थांनी उद्योग जगताशी समन्वय ठेवावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योग क्षेत्रास बळकट करण्याकरिता नवीन तंत्रज्ञान भारतातच विकसित व्हावे याकरिता लागणारे कुशल तंत्रज्ञ हे शैक्षणिक संस्थांनी उपलब्ध करून देण्याकरिता अभ्यासक्रमामध्ये काळानुरूप बदल करावेत, असे आवाहन केले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य ज्ञानदेव नाठे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अशोक कटारिया, संतोष मुथा, सुरेश वाघ, किशोर पाटील, प्रा. एफ. ए. खान आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे परीक्षा नियंत्रक प्रा. गिरीश वानखेडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन ठाकरे, प्रा. दीपाली किर्तने व आभार प्रा. प्रमोद कोचुरे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.सुवर्ण पदक प्रदानपाहुण्यांच्या हस्ते प्रथम सत्राच्या ४८८ व व्दितीय सत्राच्या १५३ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. तसेच संस्थेत शिकविल्या जाणाऱ्या १० अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रथम व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण