शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राष्ट्रवादीच्या मोर्चाने भाजपाला बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:28 IST

करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापूर्वी आयुक्तांच्या विरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दर्शवून भाजपातील एक गट पुन्हा तयारीला लागला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांविरोधात धार राजकीय लाभ उठविण्याची तयारी

नाशिक : करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापूर्वी आयुक्तांच्या विरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दर्शवून भाजपातील एक गट पुन्हा तयारीला लागला आहे.नाशिक महापालिकेत राष्टÑवादीचे नगण्य सदस्य असल्यामुळे त्यांच्या विरोध व समर्थनाचा फारसा विचार महापालिकेच्या राजकारणात आजवर करण्यात आलेला नाही, परंतु त्यांचा आयुक्त मुंढे यांच्या काही निर्णयांना विरोध असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. मात्र आता नाशिककरांच्या महापालिकेशी निगडित असलेल्या करवाढीसह अन्य प्रश्नांमध्ये खुद्द छगन भुजबळ यांनीच लक्ष घातल्याचे सोमवारच्या मोर्चातून उघड झालेआहे. भुजबळ यांनी अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करून मोर्चात दाखविलेली सक्रियता पाहता, त्याची गांभीर्याने दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे.भुजबळ यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच महापालिकेला कामकाज सुधारण्याचा सल्ला देतानाच जोपर्यंत जनसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. भुजबळ यांच्या आक्रमकराजकारणाशी भाजपा चांगलेच परिचित असल्यामुळे राष्टÑवादीच्या या मोर्चामुळे नाशिककरांची पुन्हा राष्ट्रवादीला सहानुभूती मिळू शकते अशी भीती दाखविण्यास भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आता पक्षश्रेष्ठींना मोकळे झाले आहेत. भाजपाने करवाढ रद्द करण्यासाठी विशेष महासभेत निर्णय घेवूनही आयुक्त मुंढे बधले नाही, शिवाय मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने नैराश्येत आलेल्या भाजपाला राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाने बळ मिळाले आहे.सरसकट तोडगा काढण्याचा रेटाकरवाढीच्या विरोधात राजकीय पक्ष म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसनेच मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याची शासनपातळीवरून दखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरात भाजपाविरोधी वातावरण तयार होण्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी आयुक्त मुंढे यांच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अथवा करवाढीसह अन्य मुद्द्यांवर सरसकट तोडगा काढावा, अशी मागणी रेटण्यासाठी एक गट तयारी करू लागला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा