शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राष्ट्रवादीच्या मोर्चाने भाजपाला बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:28 IST

करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापूर्वी आयुक्तांच्या विरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दर्शवून भाजपातील एक गट पुन्हा तयारीला लागला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांविरोधात धार राजकीय लाभ उठविण्याची तयारी

नाशिक : करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापूर्वी आयुक्तांच्या विरोधात मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दर्शवून भाजपातील एक गट पुन्हा तयारीला लागला आहे.नाशिक महापालिकेत राष्टÑवादीचे नगण्य सदस्य असल्यामुळे त्यांच्या विरोध व समर्थनाचा फारसा विचार महापालिकेच्या राजकारणात आजवर करण्यात आलेला नाही, परंतु त्यांचा आयुक्त मुंढे यांच्या काही निर्णयांना विरोध असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. मात्र आता नाशिककरांच्या महापालिकेशी निगडित असलेल्या करवाढीसह अन्य प्रश्नांमध्ये खुद्द छगन भुजबळ यांनीच लक्ष घातल्याचे सोमवारच्या मोर्चातून उघड झालेआहे. भुजबळ यांनी अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करून मोर्चात दाखविलेली सक्रियता पाहता, त्याची गांभीर्याने दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे.भुजबळ यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच महापालिकेला कामकाज सुधारण्याचा सल्ला देतानाच जोपर्यंत जनसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. भुजबळ यांच्या आक्रमकराजकारणाशी भाजपा चांगलेच परिचित असल्यामुळे राष्टÑवादीच्या या मोर्चामुळे नाशिककरांची पुन्हा राष्ट्रवादीला सहानुभूती मिळू शकते अशी भीती दाखविण्यास भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आता पक्षश्रेष्ठींना मोकळे झाले आहेत. भाजपाने करवाढ रद्द करण्यासाठी विशेष महासभेत निर्णय घेवूनही आयुक्त मुंढे बधले नाही, शिवाय मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने नैराश्येत आलेल्या भाजपाला राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाने बळ मिळाले आहे.सरसकट तोडगा काढण्याचा रेटाकरवाढीच्या विरोधात राजकीय पक्ष म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसनेच मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याची शासनपातळीवरून दखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरात भाजपाविरोधी वातावरण तयार होण्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी आयुक्त मुंढे यांच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अथवा करवाढीसह अन्य मुद्द्यांवर सरसकट तोडगा काढावा, अशी मागणी रेटण्यासाठी एक गट तयारी करू लागला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा