शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
4
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
5
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
6
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
7
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
8
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
9
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
10
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
11
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
12
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
13
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
14
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
15
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
16
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
17
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
18
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
19
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
20
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय किसान महासंघाचा 1 जूनपासून देशव्यापी शेतकरी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:34 IST

सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचा विश्वास संपाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे१ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप

नाशिक : सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार असल्याचा विश्वास संपाच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी व्यक्त केला आहे.नाशिकमधील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (दि.२८)पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गिड्डे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करताना यावेळी होणारा देशव्यापी संप पूर्णपणे गनिमी कावा पद्धतीने केला जाणार असल्याचे सांगितले. या संपादरम्यान १ जून पासून शहरातील दूध व भाजीपाला पुरवठा रोखला जाणार असून संपकाळात शहरातूनही काही खरेदी केली जाणार नाही. शेतकरी भाजीपाला बाजार समित्यांमध्ये न नेता थेट ग्राहकांना ६० रुपये प्रतिकिलो दराने तसेच दूध डेअरीमध्ये न नेता गावातच किंवा तालुक्याच्या ठिकाणी ५० रुपये लिटरप्रमाणे विकू शकतात असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गेल्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या राज्यव्यापी संपात अनेक मागण्या राज्यसरकारच्या अखत्यारीतील नव्हत्या,त्यामुळे यावेळी देशव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करवून घेण्यासाठी लढा उभारण्यात येत आहे. या आंदोलनात देशभरातील २२ राज्यांतून शेतकरी सहभागी होणार आहे. जम्मू काश्मिर ते केरळपर्यंत शेतकऱ्यांनी केलेले हे पहिलेच आंदोलन असून राष्ट्रीय किसान महासंघाच्या १३० व किसान एकता मंचच्या ६० अशा १७० संघटना या देशव्यापी लढ्यात उतरणार असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनराष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचातर्फे पुकारण्यात येणार संपाविषयी व शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी शेतकरी संपाचे नेते संदीप गिड्डे व शंकर दरेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतीमालाचे कवडीमोल बाजारभाव, लहरी हवामान, शेतीविरोधी सरकारी धोरण यामुळे देशातील शेती उद्योग पूर्णपणे धोक्यात आला आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास देशातील शेतकऱ्यांचे अस्तित्वच संपूण जाण्याची भिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांला वाचविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह देशबरातील शेतकरी संप करणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी