शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक ...

ठळक मुद्देजळगावात २१० विहरी अधिगृहितधुळ्यात १८ गावांमध्ये टॅँकर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक विभागातील ३७६ गावे, २९९६ वाड्यातील १७ लाख लोकांसाठी ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाण्याची गरज भागविण्यासाठी ३८५ गावातील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. विभागात सर्वाधिक जास्त नगर जिल्ह्यात व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नंदुरबार जिल्ह्याला अजूनपर्यंत टॅँकरची गरज भासलेली नाही.यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून गावखेड्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी विभागात आत्तापासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून नगर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेली आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिनेच झाले असून अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. नाशिक विभागातील अनेक गावे व वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाण्याची तहान भागविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील १६४ गावे, ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ४१ गावातील विहीरी देखील अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी ३९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून ४ लाख ३ हजार नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.धुळे जिल्ह्यातील १८ गावांत १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ८० गावांसाठी विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी १५ विहीर अधिग्रहण करण्यात आले असून ४३ हजार लोकसंख्येला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात अद्यापपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासलेली नाही.जळगांव जिल्ह्यातील ११० गावांमध्ये ९१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २१० गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी ३ विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या असून २ लाख २६ हजार लोकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४४४ गावे २ हजार ४९९ वाड्यांमध्ये ६७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५४ गावांसाठी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून टॅँकरकरिता ४० विहीर अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक विभागात पाण्याची गरज भागविण्यासाठी ७३६ गावे, २९९६ वाड्यांमध्ये ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ३८५ गावासाठी विहीर व ९७ विहिरी टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. विभागातील १७ लाख लोकांसाठी याद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी