शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक ...

ठळक मुद्देजळगावात २१० विहरी अधिगृहितधुळ्यात १८ गावांमध्ये टॅँकर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक विभागातील ३७६ गावे, २९९६ वाड्यातील १७ लाख लोकांसाठी ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाण्याची गरज भागविण्यासाठी ३८५ गावातील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. विभागात सर्वाधिक जास्त नगर जिल्ह्यात व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नंदुरबार जिल्ह्याला अजूनपर्यंत टॅँकरची गरज भासलेली नाही.यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून गावखेड्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी विभागात आत्तापासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून नगर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेली आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिनेच झाले असून अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. नाशिक विभागातील अनेक गावे व वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाण्याची तहान भागविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील १६४ गावे, ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ४१ गावातील विहीरी देखील अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी ३९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून ४ लाख ३ हजार नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.धुळे जिल्ह्यातील १८ गावांत १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ८० गावांसाठी विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी १५ विहीर अधिग्रहण करण्यात आले असून ४३ हजार लोकसंख्येला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात अद्यापपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासलेली नाही.जळगांव जिल्ह्यातील ११० गावांमध्ये ९१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २१० गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी ३ विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या असून २ लाख २६ हजार लोकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४४४ गावे २ हजार ४९९ वाड्यांमध्ये ६७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५४ गावांसाठी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून टॅँकरकरिता ४० विहीर अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक विभागात पाण्याची गरज भागविण्यासाठी ७३६ गावे, २९९६ वाड्यांमध्ये ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ३८५ गावासाठी विहीर व ९७ विहिरी टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. विभागातील १७ लाख लोकांसाठी याद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी