शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

नाशिक, नगरला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक ...

ठळक मुद्देजळगावात २१० विहरी अधिगृहितधुळ्यात १८ गावांमध्ये टॅँकर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला असून पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने नाशिक विभागातील ३७६ गावे, २९९६ वाड्यातील १७ लाख लोकांसाठी ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाण्याची गरज भागविण्यासाठी ३८५ गावातील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. विभागात सर्वाधिक जास्त नगर जिल्ह्यात व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून नंदुरबार जिल्ह्याला अजूनपर्यंत टॅँकरची गरज भासलेली नाही.यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून गावखेड्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी विभागात आत्तापासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून नगर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेली आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिनेच झाले असून अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. नाशिक विभागातील अनेक गावे व वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाण्याची तहान भागविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील १६४ गावे, ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ४१ गावातील विहीरी देखील अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी ३९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून ४ लाख ३ हजार नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.धुळे जिल्ह्यातील १८ गावांत १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ८० गावांसाठी विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी १५ विहीर अधिग्रहण करण्यात आले असून ४३ हजार लोकसंख्येला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात अद्यापपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व विहीर अधिग्रहण करण्याची गरज भासलेली नाही.जळगांव जिल्ह्यातील ११० गावांमध्ये ९१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २१० गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर टॅँकरसाठी ३ विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या असून २ लाख २६ हजार लोकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील ४४४ गावे २ हजार ४९९ वाड्यांमध्ये ६७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५४ गावांसाठी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून टॅँकरकरिता ४० विहीर अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक विभागात पाण्याची गरज भागविण्यासाठी ७३६ गावे, २९९६ वाड्यांमध्ये ९६५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ३८५ गावासाठी विहीर व ९७ विहिरी टॅँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. विभागातील १७ लाख लोकांसाठी याद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी