शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

परतीच्या पावसाने सर्व धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 19:23 IST

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर ...

ठळक मुद्दे१०० टक्के पाणीसाठा : गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के अधिक साठा

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलतेन पाणीसाठा २४ टक्के अधिक असल्याने पाणी नियोजनासंदर्भात होणारा वाद यंदा टळणार असल्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच धरणांचा पाणीसाठा ९० टक्केच्यापुढे आणि १५ तारखेपर्यंत गिरणा खोºयातील एक-दोन प्रकल्प वगळता धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. तत्पूर्वी आॅगस्टअखेरलाही धरणसाठा शंभर टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबरच्या पावसात शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाला होता. त्यामुळे सातत्याने विसर्ग वाढवावा लागला होता. आता आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वाढला आहे.यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने आळंदी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ६५,५३५ दलघफू पाणीसाठा म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवषीआॅक्टोबर अखेर अवघा ७६ टक्के इतका पाणीसाठा होता. जिल्ह्यात गंगापूर धरणसमूहात ४ धरणांचा समावेश आहे तर पालखेड धरण समूहात सहा धरणे आहेत. दारणा समूहातदेखील सहा धरणांचा समावेश आहे. भोजापूर हा मध्यम प्रकल्प आहे. गिरणा खोरे धरणसमूहात चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा असे पाच प्रकल्प आहेत, तर दोन मध्यमस्वरूपाचे प्रकल्पआहेत.

टॅग्स :NashikनाशिकDamधरणRainपाऊस