शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

परतीच्या पावसाने सर्व धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 19:23 IST

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर ...

ठळक मुद्दे१०० टक्के पाणीसाठा : गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के अधिक साठा

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलतेन पाणीसाठा २४ टक्के अधिक असल्याने पाणी नियोजनासंदर्भात होणारा वाद यंदा टळणार असल्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच धरणांचा पाणीसाठा ९० टक्केच्यापुढे आणि १५ तारखेपर्यंत गिरणा खोºयातील एक-दोन प्रकल्प वगळता धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. तत्पूर्वी आॅगस्टअखेरलाही धरणसाठा शंभर टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबरच्या पावसात शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाला होता. त्यामुळे सातत्याने विसर्ग वाढवावा लागला होता. आता आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वाढला आहे.यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने आळंदी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ६५,५३५ दलघफू पाणीसाठा म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवषीआॅक्टोबर अखेर अवघा ७६ टक्के इतका पाणीसाठा होता. जिल्ह्यात गंगापूर धरणसमूहात ४ धरणांचा समावेश आहे तर पालखेड धरण समूहात सहा धरणे आहेत. दारणा समूहातदेखील सहा धरणांचा समावेश आहे. भोजापूर हा मध्यम प्रकल्प आहे. गिरणा खोरे धरणसमूहात चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा असे पाच प्रकल्प आहेत, तर दोन मध्यमस्वरूपाचे प्रकल्पआहेत.

टॅग्स :NashikनाशिकDamधरणRainपाऊस