नाशिकचे विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला दिशा देणारे ठरेल; किशोर ढमाले यांचे मत

By संजय पाठक | Published: February 12, 2021 03:41 PM2021-02-12T15:41:56+5:302021-02-12T15:47:01+5:30

नाशिक- नाशिक हे ऐतिहासीक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची तसेच आदिवासींच्या उठावाची  आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नाशिकला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा याच भूमीत होणारे हे संमेलन विद्रोही चळवळीला ऐतिहासीक दिशा देणारे ठरेल, असे मत विद्रेाही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.

Nashik's Vidrohi Sahitya Sammelan will be the direction of the movement; Opinion of Kishor Dhamale | नाशिकचे विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला दिशा देणारे ठरेल; किशोर ढमाले यांचे मत

नाशिकचे विद्रोही साहित्य संमेलन चळवळीला दिशा देणारे ठरेल; किशोर ढमाले यांचे मत

googlenewsNext
ठळक मुद्देउदघाटक म्हणून ग्रेटाशी संपर्क सुरूसंमेलनाध्यक्ष अद्याप निश्चित नाही

नाशिक-नाशिक हे ऐतिहासीक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची तसेच आदिवासींच्या उठावाची  आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नाशिकला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा याच भूमीत होणारे हे संमेलन विद्रोही चळवळीला ऐतिहासीक दिशा देणारे ठरेल, असे मत विद्रेाही साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये अखिल मराठीसाहित्य संमेलन होत असून त्याचवेळी विद्रोही साहित्य संमेलनही होणार आहे.त्याचीही तयारी सध्या सुरू आहे. त्या पार्श्वूभमीवर या संमेलनाचा किशोर ढमाले यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- नाशिकमध्ये पंधरावे विद्रेाही साहित्य संमेलन हेात आहे. सध्याचे वातारवरण बघता या संमेलनाकडून काय अपेक्षा आहेत?

ढमाले- जेथे पारंपरीक साहित्य संमेलन असते तेथे विद्रोही साहित्य संमेलन भरवले जाते. नाशिकमध्ये समोरासमेार म्हणजे एकाच वेळी भरविण्यात येणारे हे तिसरे संमेलन आहे. सध्या देशात विव्देषाचे वातावरण आहे. जातीय, धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. देशाच्या घटनेतील लोकशाही मुल्य व्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विद्रोही सांस्कृतीक चळवळीसमोर देखील आव्हान आहे. अशावेळी समतेचा विचार पसरविणारे हे संमेलन हेाणार आहे. त्यामुळे या परिस्थतीत हे संमेलन अधिक महत्वाचे आहे.

प्रश्न- संमेलनाच्या उदघाटनासाठी पर्यावरणवादी युवा नेत्या ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रीत करण्यात येणार होते..

ढमाले- होय, व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणाऱ्या मान्यवरांना विद्रोही साहित्य संमेलनास नेहेमीच निमंत्रीत केले जाते. या पूर्वी तिसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी अशाच प्रकारे अनेक देशांनी बंदी घातलेल्या डॉ. एजाज अहमद यांना निमंत्रीत करण्यात आले हेाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रीत करताना यापूर्वीच आफ्रीकन लेखीका एंगेला डेव्हीस यांनाही निमंत्रीत करण्यात आले हेाते. यंदा ग्रेट थनबर्ग यांना निमंत्रीत करण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संमेलनास अजून सव्वा ते दीड महिना बाकी असून या कालवधीत निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.

प्रश्न- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. यशवंत मनेाहर यांच्यासह काही नावे चर्चेत आहेत?

ढमाले- साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. विद्रेाही सांस्कृतीक चळवळीचे पदाधिकारी रविवारी (दि.१४) नाशिकच्या स्थानिक आयेाजकांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर दोन तीन टप्प्यात एकदा कार्यक्रमाची पूर्व तयारी झाली की अध्यक्षही ठरतील.

मुलाखत- संजय पाठक

 

Web Title: Nashik's Vidrohi Sahitya Sammelan will be the direction of the movement; Opinion of Kishor Dhamale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.