शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आनलाइन परीक्षा झाल्यास ग्रामीण भागात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 6:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : लॉकडाउनमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच दि. ३ मेनंतर आणखी लॉकडाउन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाउनमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच दि. ३ मेनंतर आणखी लॉकडाउन वाढविल्यास परीक्षा कधी होणार याकडे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर परीक्षा आनलाइन पद्धतीने घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, असे काही विद्यार्थी व प्राध्यापकांचे म्हणणे आहे. कारण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची समस्या असते. नेटवर्क नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेपेक्षा आॅफलाइन परीक्षा अधिक सोयीची वाटते. परंतु आता लॉकडाउन वाढल्यास नेमक्या परीक्षा केव्हा होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तसेच अनेक महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अपूर्ण असून, काही ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्राध्यापक विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांना यात सहभाग घेण्यास अडचणी येत आहेत. विशेषत: गावाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना नेटवर्कच उपलब्ध नसल्याने इंटरनेटच्या माध्यमातून प्राध्यापकांशी संपर्क होत नाही. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर प्रत्यक्ष (आॅफलाइन) पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण व्हावा मगच परीक्षा घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून होत आहे.राज्यातील अन्य विद्यापीठांतर्गत महाविद्यालयामार्फत आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मात्र अद्याप आॅनलाइन परीक्षेबाबत निर्णय झालेला नसल्याचे समजते. दरम्यान, शिक्षण विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूमिकेनंतर परीक्षेबाबत नेमका काय निर्णय होतो हे कळणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ