शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नाशिकमध्ये पोस्टमनकडून आधार कार्डचा ‘बाजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 18:57 IST

नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देआधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याची तक्रार टपाल खात्याचे मात्र याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य

नाशिक : नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे.आधार कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने शहरात ठिकठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत. ज्याच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे काम संबंधित केंद्रांवर केले जाते. दुरुस्ती केलेले कार्ड टपालाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळेल, असे सांगितले जाते. परंतु दुरुस्ती केल्यानंतही दोन ते तीन महिने ग्राहकांना दुरुस्ती केलेले आधार कार्ड मिळतच नसल्याचा अनेकांना अनुभव आहे. यासंदर्भात टपाल कार्यालयाकडे तक्रार करूनही ग्राहकांना अजून आधार कार्ड मिळालेले नाही. ही परिस्थिती केवळ नाशिकरोडची नव्हे तर गांधीनगर, उपनगर, अशोकामार्ग, टाकळी येथील नागरिकांची तक्रार आहे.नाशिकरोडमधील गोसावीवाडी, पवारवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, देवळालीगाव परिसरातील अनेक नागरिकांना आधार कार्ड मिळाले नसल्याची तक्रार आहे. टपालचा बटवडा करणारे पोस्टमन घरोघरी दुरुस्ती केलेले आधार कार्ड वितरित करीत नसून एखाद्या दुकानात संपूर्ण परिसरातील कार्ड देऊन निघून जात असून, संबंधित दुकानदार कार्ड घेण्यासाठी येणाऱ्याकडून पैसे उकळत असल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. हा सारा गैरप्रकार होत असताना टपाल खात्याचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकPostal Groundपोस्टल ग्राऊंड