शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 7:06 PM

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के ...

ठळक मुद्देप्राथमिक अंदाज : ५० टक्के पिके आडवी; सात तालुके सर्वाधिक बाधित

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत. लागवडीखालील द्राक्षबागांपैकी सुमारे ७० टक्के द्राक्ष जमीनदोस्त झाली आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला जुंपली असून, पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. परतीच्या पावसामुळे पंधरा तालुक्यांपैकी सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा या जिल्ह्यातील पूर्व तालुक्यांमधील पिकांना चांगलाच फटका बसला आहे.त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झालेले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान हे बागलाण, निफाड, दिंडोरी, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले आहे. द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक शेतकऱ्यांच्या बागा या जमीनदोस्त झाल्या असल्याचेही दिसून आले.जिल्ह्यात यावर्षी लागवडीखालील क्षेत्र ७.४० लाख हेक्टर इतके होते. परतीच्या पावसामुळे सुमारे ३.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे म्हणजेच जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये द्राक्ष आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. पीकनिहाय नुकसानीचा अंदाज पाहिला तर ६० हजार हेक्टरवर लावण्यात आलेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. द्राक्षांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस