शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

जलद न्याय चळवळीसाठी वकीलांचे सहकार्य आवश्यक : पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 8:45 PM

नाशिक : देशाच्या संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला न्याय मिळविण्याचा अधिकार आहे़ मात्र, न्यायालयांमधील कोट्यवधी प्रलंबित खटले, न्यायालये व न्यायाधीशांची अपुरी संख्या, अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी मिळणारा अपुरा निधी यामुळे न्यायदानास विलंब होत असल्याने नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे़ न्यायसंस्थेचे बळकटीकरण हे राजकारण्यांसाठी हानीकारक असल्याने लोकप्रतिनिधी हेतुपूरस्सर याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे न्यायव्यवस्था वाचविण्यासाठी ...

ठळक मुद्देन्याययात्रा : न्यायसंस्था वाचवा, देश वाचवा मोहीमवकिलांना सहभागी होण्याचे आवाहन

नाशिक : देशाच्या संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला न्याय मिळविण्याचा अधिकार आहे़ मात्र, न्यायालयांमधील कोट्यवधी प्रलंबित खटले, न्यायालये व न्यायाधीशांची अपुरी संख्या, अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी मिळणारा अपुरा निधी यामुळे न्यायदानास विलंब होत असल्याने नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे़ न्यायसंस्थेचे बळकटीकरण हे राजकारण्यांसाठी हानीकारक असल्याने लोकप्रतिनिधी हेतुपूरस्सर याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे न्यायव्यवस्था वाचविण्यासाठी ‘फोरम फॉर फास्ट जस्टीस’संस्थेतर्फे न्याययात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय संयोजक प्रवीण पटेल यांनी सोमवारी (दि़१२) जिल्हा न्यायालयात केले़

जलदगतीने न्याय मिळावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फोरम फॉर फास्ट जस्टीसमार्फत देशभरात न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी शहरातून पदयात्रा काढण्यात आली़ जिल्हा न्यायालयातील बार रूममध्ये दुपारी झालेल्या स्वागत समारंभात पटेल यांनी यात्रेची आणि मंचच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशभरातील विविध न्यायालयांमध्ये आजमितीस ३़७ कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत़ त्यामुळे पक्षकार गुंडांचे उंबरठे झिजवत आहेत़

कायद्यात दिवाणी दाव्यांसाठी केवळ तीन अ‍ॅडर्जनमेंटचे तरतूद असताना त्यासाठी २५ ते ३० वर्षे तर फौजदारी खटल्यांच्या निकालासाठी १५ ते २० वर्षे लागतात़ मात्र, हीच प्रक्रिया अमेरीका व इतर युरोपीय देशांमध्ये अवघ्या दोन ते अडीच वर्षात पार पडते़ याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे असलेल्या न्यायाधीशांची संख्या आहे़ भारतात १० लाख लोकसंख्येसाठी १४ न्यायाधीश तर फ्रान्समध्ये १२४, अमेरीका १०७, कॅनडा ७५, इंग्लंड ५१, आॅस्ट्रेलियात ४१ आहे़ सर्वोच्च न्यायालयाने २००७ मध्ये दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत केंद्र सरकारला १० लाख लोकसंख्येमागे ५० न्यायाधीश नियुक्त करण्याचे आदेश दिले होते मात्र, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही़

देशाच्या अर्थसंकल्पात न्यायसंस्थेसाठी केली जाणारी तरतूद ही अत्यल्प आहे़ संसदेतील ३२ टक्के लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण अडचणीचे आहे़ १९५६ साली न्यायालयांमध्ये २२ लाख प्रकरणे प्रलंबित असताना संसदेत गदारोळ झाला. मात्र आता कोट्यवधी खटले प्रलंबित असताना त्या विषयावर एकदाही चर्चा होत नाही़ न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाऐवजी लोकअदालत सुरू करून न्यायाचा खून केला जात असून याविरोधात सुरू असलेल्या या चळवळीत वकिलांचे योगदान आवश्यक असल्याचे पटेल म्हणाले़ नाशिक जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, सामाजीक कार्यकर्ते पां. भा. करंजकर आदींसह वकिलवर्ग उपस्थित होता़

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय