नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रताम पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काय घोषणा करतात याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळयातूनच मोदी प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.दरम्यान, नरेंद्र मोदींचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे.पंचवटीतील तपोवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होत असून या सोहळयसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सभास्थळी दाखल होणार आहेत. या समारोप कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्य शाासनाचे डझनभर मंत्री नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.नाशिकमध्ये सभा होणार असल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा, स्वातंत्र्यवीर सावरकर, एचएएल कारखाना तसेच विमानसेवा याविषयी मोदी काय बोलणार याकडे नाशिककरांचे लक्ष आहे. याबरोबरच काश्मिरचा मुद्या, दहशतवाद आणि पाकीस्तान संदर्भात त्यांच्या भुमिकेकडे देखील देशाचे लक्ष असणार आहे. नाशिकमधून विधानसभा निवडणूकीच रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता असल्याने मोदी शरद पवार तसेच सेना युती संदर्भात काही वक्तव्य करणार का?याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.