शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ हवेसाठी देशात नाशिकचा २१ वा क्रमांक; इंदूर अव्वल! पाहा यादी

By suyog.joshi | Updated: September 9, 2023 15:24 IST

स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२३ ची यादी झाली जाहीर

नाशिक (सुयोग जोशी) : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित स्वच्छ वायु सर्वेक्षण-२०२३ (किंवा स्वच्छ हवा सर्वेक्षण) मध्ये मध्य प्रदेशचे इंदूरच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला प्रथम क्रमांक प्रदान केला. आग्रा आणि ठाणे अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानावर तर नाशिकचा देशात २१ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला. नाशिकला २०० पैकी १६०.३ गुण मिळाले.

२०२६ पर्यंत वायू प्रदूषण ४० टक्यांपर्यंत कमी करण्यासाठी एन कॅप कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी एकूण १३१ शहरांची निवड करण्यात आली होती. या शहरांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. राज्यातील मुंबई व नागपूरनंतर नाशिकचा २१ वा क्रमांक राहिला आहे. या सर्व्हेक्षणाच्या तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यात प्रथम श्रेणी अंतर्गत (दशलाखापेक्षा जास्त लोकसंख्या) इंदूर शहर प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर आग्रा आणि ठाणे आहे. दुसर्या श्रेणीत (३-१० लाख लोकसंख्या) अमरावतीने प्रथम क्रमांक मिळवला, त्यानंतर मुरादाबाद आणि गुंटूरचा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे, तिसर्या श्रेणीसाठी (३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या) परवानू (हिमाचल प्रदेश) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर कलाअंब आणि अंगुल यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेसाठीच्या चौथा आंतरराष्ट्रीय दिवस (स्वच्छ वायु दिवस २०२३) या जागतिक संकल्पनेला सक्षम करण्यासाठी देशभरातील १३१ शहरांचा सहभाग करण्यात आला होता. त्यातून जनसामान्यांचा सहभाग निर्माण करणे, गुंतवणूक वाढवणे आणि वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा उद्देश ठेवण्यात आला होता. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (एनकॅप) राष्ट्रीय स्तरावरील हा उपक्रम राबवत आहेत. ज्यामध्ये भारतातील शहर आणि प्रादेशिक स्तरावरील वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी कृतीं आराखडा देण्यात आलेला आहे.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

एनकॅपच्या सर्व भागधारकांचा सहभाग आणि आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करून वायू प्रदूषणावर नियोजनपध्दतीने मात करणे हेे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२६ पर्यंत वायू प्रदूषण ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणी करण्यासाठी एकूण १३१ शहरांची निवड करण्यांत आली होती.

एनकॅप उपक्रमासाठी देशपातळीवर निवडलेल्या १३१ शहरातील हवा शुध्द करण्यासाठी उपाय योजना सुचविण्यात आल्या होत्या. त्यात राष्ट्रीय-स्तरीय कृती योजना, राज्य-स्तरीय कृती योजना आणि शहर-स्तरीय कृती योजना तयार करणे आणि अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या शहरांना कृती आराखडा देण्यात आला होता. त्यानुसार केलेल्या सर्व्हेक्षणाचा निकाल सादर करण्यात आला. त्यात पहिल्या २५ शहरांमध्ये राज्यातील ठाणे मुंबई नागपूरसह नाशिकचा समावेश आहे.

नाशिक महापालिकेची प्रगतीच आहे. गेल्यावर्षी १३८ गुुण होते, यावर्षी १६० गुण मिळाले आहेत. यांत्रिकी झाडू आल्यानंतर पुढच्या वर्षी अधिक गुण मिळतील.-विजयकुमार मुंडे, उपायुक्त, पर्यावरण व गोदा सवंर्धन

टॅग्स :Nashikनाशिक