शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

स्मार्ट सिटी विरूध्द नाशिक महापालिका...सामना रंगणारच होता...

By संजय पाठक | Updated: February 3, 2019 00:25 IST

एखादी संस्था घटनात्मक संस्थेला आव्हान देऊ लागली की संघर्ष अटळ होतो. नाशिक शहराचे स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनी स्थापन करण्याचा घाट घातला गेला तेव्हा हे सारे अटळच होते आणि आता तसेच घडत आहे. महापालिकेचे मोजके प्रतिनिधी याच कंपनीत जाऊन कामकाज करतात आणि कंपनीत काय चालते तेच नगरसेवकांना कळत नाही अशाप्रकारचा जो समज रूढ होत चालला आहे. त्यातून कंपनी विरूध्द नगरसेवक असाच नव्हे तर कंपनीचे संचालक आणि पदाधिकारी अशी दुहेरी भूमिका बजावणारे पदाधिकारी देखील कैचीत सापडणार आहे.

ठळक मुद्देचांगल्या कामाचे श्रेय कंपनीला रोष असेल तर महापालिकेवरकंपनीतील कामकाजाविषयी बहुतांशी नगरसेवक अनभिज्ञमहापालिकेसारख्या घटनात्मक संस्थेला दुय्यम संस्थेचे आव्हान

संजय पाठक, नाशिक -  एखादी संस्था घटनात्मक संस्थेला आव्हान देऊ लागली की संघर्ष अटळ होतो. नाशिक शहराचे स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनी स्थापन करण्याचा घाट घातला गेला तेव्हा हे सारे अटळच होते आणि आता तसेच घडत आहे. महापालिकेचे मोजके प्रतिनिधी याच कंपनीत जाऊन कामकाज करतात आणि कंपनीत काय चालते तेच नगरसेवकांना कळत नाही अशाप्रकारचा जो समज रूढ होत चालला आहे. त्यातून कंपनी विरूध्द नगरसेवक असाच नव्हे तर कंपनीचे संचालक आणि पदाधिकारी अशी दुहेरी भूमिका बजावणारे पदाधिकारी देखील कैचीत सापडणार आहे.

 नाशिक महापालिकेत कंपनी नावाचे मॉडेल खरे तर नवीन आहे. ते महापालिकेला सवयीचे नाही. अन्यत्र कंपनीचे अनुभव देखील फार सोयीचे नाही. महापालिकेसारख्या संस्थेत जे काही कामकाज होते ते लोकशाहीला आणि महापालिका अधिनियमानुसार होते. महापालिका ही लोकनियुक्त संस्था असल्यानंतर अनेक टप्प्यावर गतिरोध होणे हे स्वाभविकच आहे. तो कित्येकदा सहेतुक असल्याची टीका जरी झाली तरी शेवटी कोणताही प्रस्ताव किंवा धोरण हे विशीष्ट प्रक्रियेतून पार पाडणे अटळ असते. शेवटी महापालिकेचा जो काही कारभार आहे, तो उघडपणे चालणार असतो. स्मार्ट सिटीचे काम मुळातच ठराविक कालावधीपर्यंत असल्याने अशाप्रकारचा गतिरोध असेल तर वेळेत कामे होणार नाही म्हणूनच कंपनीचे प्रारूप सरकारने मांडले. कामे वेगाने व्हावी हा त्यामागील उद्येश असला तरी अपारदर्शकता असावी असे सरकारचे कुठेच म्हणणे नाही. परंतु तरीही एकाच कार्यक्षेत्रात दोन समांतर संस्था असल्याने वाद प्रतिवाद होणारच. शेवटी प्रस्तावातील चांगले काम झाले तर कंपनीचे श्रेय आणि वाद किंवा रोष पत्करणयची वेळ आली तर ते महापालिकेचे धोरण म्हणून नामानिराळे राहण्याचे काम करणार हे उघड होते. मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकरणात नागरीकांनी कंपनीला विरोध केला की त्यांना महापालिकेकडे पाठविले जाते. त्यातून हे दिसत आहेच प्परंतु आता आर्थिक संघर्ष सुरू झाला आहे. 

 स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा प्रकल्प केंद्र आणि राज्यशासनाच्या अनुदानावर अवलंबून आहे परंतु महापालिकेचा हिस्सा त्यात आहे. कोणत्याही प्रस्तावासाठी अतिरीक्त खर्च झाला तर तो महापालिकाच करणार आहे, असे गृहीत धरून केवळ दोन प्रकल्पासाठी होत असलेला ३०४ कोटी रूपयांचा जादा खर्च महापालिकेकडून वसुल करण्याच्या हालचालीला सुरूवात झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाण प्रकल्पाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते, पाणी आणि गटारी ही सर्व कामे एकाच ठेकेदाराकडून करून घेण्याच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या त्या ६० टक्के जादा दराने आल्या तर प्रोजेक्ट गोदाच्या निविदा ३८ टक्के ज्यादा दराने आल्या. त्यामुळेच ३०४ कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे मुळातच इतक्या मोठ्या प्रमाणात निविदा आल्या तर महापालिकेत गदारोळ झाला असता आणि त्याची चौकशी होऊन प्रसंगी नवीन निविदा मागवण्यासाठी कार्यवाही झाली असती परंतु येथे मात्र तसे काही न होता निविदा मंजुरच करण्याचे घाटत आहे.

विशेष म्हणजे स्मार्ट सिटी कंपनीच्या सल्लागार समितीची बैठक संचालकांच्या सह नुकतीच पार पडली. त्यात हा विषय पण झाला. परंतु त्याला कोणीही विरोध देखील केला नाही. आता याच तीनशे कोटी रूपयांचा भार सहन करण्यासाठी महापालिकेने कर्ज काढण्याचा मुद्दा आल्यानंतर शाहु खैरे आणि गुरूमित बग्गा या दोघांनी विरोध सुरू केला आहे. प्रश्न केवळ कंपनीचा नाहीच या तीनशे कोटी रूपयांमुळे नगरसेवकांची अनेक मुलभूत सुविधांची कामे होऊ शकतात. परंतु त्यासाठी कर्ज न घेता कंपनीच्या कामासाठी कर्ज काढून द्यायचे हा भलताच प्रकार झाला. त्यामुळे आज दोन नगरसेवकांचा विरोध झाला उद्या सर्वच पक्षातील नगरसेवक त्याच्या विरोधात उभे राहतील आणि कंपनी विरूध्द महापालिका उघड संघर्ष होणार आहे.  

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी