शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

महापालिकेत ना येण्याची वेळ, ना जाण्याची; दुपारच्या जेवणासाठी अनेकांची सुट्टी दोन तास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 6:41 PM

नाशिक - महापालिकेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात काय हा मोठा प्रश्न ...

नाशिक - महापालिकेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात काय हा मोठा प्रश्न आहे. त्यातच मुख्यालयासह अन्यत्रही भोजनाची सुटी अर्धा तास असताना अनेक विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी दुपारी एक किंवा दीड वाजता गायब झाल्यास थेट तीन ते चार वाजेनंतरच भेटतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम मात्र खोळंबत असते.

महापालिकेशी सर्वाधिक संपर्क हा सर्वसामान्य नागरिकांशी येतो. मुख्यालयात नगरसेवक, राजकीय नेते आणि ठेकेदारवगळता सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याची वेळ दुपारी साडेचारनंतरचीच असते. परंतु या नंतरही अनेक अधिकारी, अभियंते तसेच कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे येणाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. मुळात दुपारच्या भोजनाची वेळ सर्व शासकीय कार्यालयांसाठी सारखीच आहे. मात्र, महापालिकेत बाहेरील काम किंवा अन्य कामे सांगून अनेक कर्मचारी गायब असतात.

दुपारच्या भोजनासाठी अनेकजण घरी

- भोजनाच्या वेळेचे एकंदर गणित बघता, कर्मचाऱ्यांनी भोजनासाठी डबा कार्यालयात आणून तेथेच भोजन केले तर अधिक उपयुक्त ठरू शकते.

- अनेक विभागातील कर्मचारी घराजवळच राहतात असे सांगून भोजनासाठी गायब झाल्यानंतर पुन्हा वेळेवर येत नाहीत.

साहेबांनी सांगितले, साइटवर गेलो

नगररचना विभागात दुपारनंतरदेखील अनेकदा कर्मचारी भेटत नाहीत. अनेकांना वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम करण्यासासाठी जावे लागते.

- नगररचना आणि अभियांत्रिकीशी संबंधित अनेक कर्मचारी साइटवर गेल्याचे मुख्यालयात गेल्यानंतर सांगण्यात येते. मात्र, त्यामुळे नागरिकांना अकारण हेलपाटा पडतो.

माझे नगररचना विभागाशी संबंधित काम आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून तेथे राेज जाऊनही उपयोग होत नाही. इंजिनिअर भेटत नाहीत. सध्या वॉर्डरचनेची कामे सुरू आहेत, त्यामुळे ते कामात असल्याचे सांगितले जाते. सकाळी महापालिकेत प्रवेश नाही, सायंकाळी अधिकारी भेटत नाही.

- दिवाकर शिरभाते, नाशिक

काहीही कामासाठी महापालिकेत गेल्यानंतर अधिकारी, कर्मचारी न भेटणे हे कायमच झाले. दोन ते तीन चकरा मारल्याशिवाय काम होत नाही. कार्यालयीन कामाची वेळ निश्चित असताना कर्मचारी जातात कोठे?

- तुकाराम शिदोरे, पंचवटी

प्रत्येक कार्यालयात दोन ते चार कर्मचारी हजर

नाशिक शहर कार्यालयात दीड ते दोन भोजनाची वेळ असली तरी अनेक कर्मचारी महापालिकेच्या वेगवेगळ्या मजल्यावर भोजनानंतर शतपावली करताना आढळतात. कार्यालय सुरू झाल्यानंतर एकेक करीत येण्यास सुरुवात होत असली तरी प्रत्यक्ष वेळेत प्रत्येक कार्यालयात दोन ते चार कर्मचारीच हजर असतात.

कामावर येण्याची आणि जाण्याची वेळ ठरली आहे. भोजनाच्या सुटीतही वेळेत आले पाहिजे, तसे न झाल्यास संबंधित खातेप्रमुखांनी तपासणी करून कारवाई केली पाहिजे.

- मनोज घोडे पाटील, उपआयुक्त प्रशासन

 

टॅग्स :Nashikनाशिक