शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

नाशिक महापालिकेत सोयीनेच वाकतो कायदा..

By संजय पाठक | Published: April 06, 2019 7:17 PM

नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यपदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात स्पर्धा लागली आहे. या एका पदासाठी भाजपाने सोयीने कायदा वागवण्याचे ठरविले आहे. तर विभागीय आयुक्तांनी नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेत अंग काढून घेतले आहे. लोकसभा निवडणूका संपल्या की, हा विषय प्राधान्याने पटलावर येणार आहेत, त्यातून भाजपा सेनेत संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, निवडणूकीच्या निमित्ताने आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तो टळला आहेच.

ठळक मुद्देस्थायी समितीचे महत्व किती हे एका पदाच्या वादावरून लक्षात येतेशिवसेनेचा लढा एका जागेसाठीभाजपाची सत्ता असल्याने पक्षाच्या सोयीचे निर्णय होणार हे उघड आहे.

संजय पाठक, नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यपदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात स्पर्धा लागली आहे. या एका पदासाठी भाजपाने सोयीने कायदा वागवण्याचे ठरविले आहे. तर विभागीय आयुक्तांनी नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेत अंग काढून घेतले आहे. लोकसभा निवडणूका संपल्या की, हा विषय प्राधान्याने पटलावर येणार आहेत, त्यातून भाजपा सेनेत संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, निवडणूकीच्या निमित्ताने आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तो टळला आहेच.महापालिकेच्या स्थायी समितीचे महत्व हे साऱ्यांनाच माहित आहे. लोण्याचा गोळा देणारी ही समिती असल्याने सहाजिकच या समितीत साधे सदस्यपद मिळवण्यासाठी आटापीटा होतो. सभापतीपदासाठी तर आर्थिक देवाण घेवाणीवरून उमेदवारांमध्ये हाणामारीचे समर प्रसंग होईपर्यंत प्रकार घडतात. गेल्या पंचवीस ते तीस वर्षात महापालिकेच्या स्थायी समितीने हे सगळ बघितले आहे. अमोल जाधव यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत स्थायी समितीच्या सभागृहाचा आखाडा झाला आणि नगरसचिवांनाच धक्काबुक्की झाली. विनायक पांडे यांच्या महापौरपदाच्या काळात तर समसमान सदस्य संख्या असताना चिठ्ठी कशी काढावी याचे कौशल्यच त्यांनी दाखवले. त्यांच्या हस्त कौशल्यामुळे त्यांना नवी मुंबई आणि ठाणे येथे देखील सोयीची चिठ्ठी कशी काढावी यासाठी प्रशिक्षणासाठी बोलवले होते तर सभापतीपदाच्या एका निवडणूकीला स्थगिती आल्यानंतर त्याचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू नये यासाठी एका कार्यकर्त्याने आदेशच गिळून टाकला. महापालिकेत एका समितीसाठी होणाºया या संघर्षामुळे राज्य सरकारने समिती सदस्यांची निवडणूक हा प्रकारच वगळून टाकला आणि पक्षीय तौलनिक बळाचे नवे परीमाण आणले. सभापतपदाची निवडणूक राजकिय हातातून काढून घेऊन विभागीय आयुक्तांकडे सोपवली. परंतु तरीही समितीसाठी होणारा सत्ता संघर्ष कमी झालेला नाही. पक्षीय तौलनिक बळामुळे एका पक्षाचे किती सदस्य समितीच जातील हे अगोदरच ठरलेले असते. त्यामुळे समितीत दोन वर्षांऐवजी एका वर्षासाठीच संधी देण्याचे देखील नवे लाभाचे तंत्र सुरू झाले.सध्याचा विषय हाच आहे की समितीत भाजपाचे बहुमत आहे. आणि १६ पैकी नऊ सदस्य भाजपाचे असतात. सहाजिकच सातपूर येथील भाजपाच्या एका सदस्याच्या निधनामुळे भाजपाचे पक्षीय तौलनिक बळ घटले आणि त्या जागेवर लगोलग सेनेने दावा सांगितला. सेनेने न्यायलयात धाव घेतली परंतु त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले आणि विभागीय आयुक्तांनी पक्षीय तौलनिक बळ ठरविण्याचा आधिकार हा महासभेचा असतो असे सांगून हा विषय परत पाठविला. भाजपाच्या महापौर असल्याने त्या अधिकाराचा आपल्या पक्षासाठीच वापर करणार हे उघड आहे. परंतु त्यातून शासनाने कितीही सुधारणा केल्या तरी रूळलेले राजकारण आणि अर्थकारण हे त्याच ठिकाणी आहे हेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना