शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बारावीच्या कॉपी प्रकरणात नाशिकची जळगावसोबत बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:49 IST

नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह्यात केवळ एक कॉपीचे प्रकरण आढळून आले आहे, तर नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. 

ठळक मुद्देबारावी परीक्षेत कॉपींची शंभरीनाशिक, जळगावात प्रत्येकी 38 कॉपी नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे

नाशिक : बारावीची परीक्षेचे सर्व पेपर झाले असून परीक्षेच्या पूर्वार्धातच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह्यात केवळ एक कॉपीचे प्रकरण आढळून आले आहे, तर नंदुरबारमध्ये २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासणी दिली आहे. नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३, धुळे जिल्ह्यातून २५ हजार २६४, जळगावमधून ४९ हजार ४०३, नंदुरबार जिल्ह्यातील १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग जळगावमध्ये कॉपीची प्रकरणे उघड होत असल्याने परीक्षेच्या पूर्वार्धात झालेल्या वेगवेगळ्या पेपरमध्ये जळगावमधून सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. त्यातुलनेत काहीसा पिछाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातही उर्वरित पेपरमध्ये कॉपी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने सुरुवातीला दुसºयास्थानी असलेल्या नाशिकने कॉपी प्रकरणांमध्ये जळगवाची बरोबरी साधली असून, परीक्षा संपल्यानंतर नाशिक व जळगावमध्ये प्रत्येकी ३८ कॉपी प्रक रणे समोर आली आहे. तर नंदुरबार २३ कॉपीची प्रकरणे समोर आल्याने दुसºया स्थारनावर आहे. धुळे जिल्ह्यात परीक्षेच्या पूर्वार्धात एकही कॉपीचे प्रकरण समोर आले नव्हते. परंतु उत्तरार्धात धुळ्यात एक कॉपीचे प्रकरण समोर आल्याने विभागात कॉपी प्रकरणांनी शंभरी गाठली आहे. या परीक्षेत कॉपीमुक्त होण्यापासून धुळे जिल्हा केवळ एक पाऊल दूर राहिला. मात्र कॉपीमुक्तीच्या दिशेने  जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु  असल्याचे जिल्हा शिक्षण विभागाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  गेल्यावर्षी सर्वाधिक कॉपी प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव चर्चेत राहिलेले असताना यावर्षीही जळगावातील भडगाव येथील परीक्षा कें द्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रति तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यामुळे नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी