शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नाशिक निवडणूक निकाल : पश्चिम मतदारसंघातून पुन्हा सीमा हिरे यांच्या गळ्यात विजयाची माळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 17:48 IST

Nashik Vidhansabha Election Results 2019सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली.

ठळक मुद्देमतदारांनी पुन्हा भाजपला कौल दिला.सीमा हिरे यांना ७७ हजार ७४ मते मिळाली

नाशिक : पाश्चिम मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळाली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंड पुकारून थेट भाजपच्या उमेदवार विद्यमान सीमा हिरे यांना आव्हान देत बंडखोर नगरसेवक विलास शिंदे यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविले. तसेच सीमा हिरे यांना राष्टÑवादीकडून उमेदवारी करणारे डॉ. अपुर्व हिरे यांनीही टक्कर दिली. सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली.सीमा हिरे यांनी पुर्वीपासून त्यांच्या मतदारांशी असलेला संपर्क टिकवून ठेवल्यामुळे यंदाही त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ त्यांच्या मतदारसंघातून झाल्याने या यात्रेचाही प्रभाव येथील मतदारांवर पहावयास मिळाला. मतदारांनी त्यांच्या बाजूने दणदणीत कौल दिला. सुरूवातीपासूनच हिरे यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत मोठा फरक त्यांच्या व अपुर्व हिरें यांच्या मतांच्या आकडेवारीत कायम राहिला. २७ फे ऱ्या पूर्ण झाल्यानंतर सीमा हिरे यांना ७७ हजार ७४ मते मिळाली.पश्चिम मतदार-संघात बंडखोरीची परंपरा चालू निवडणुकीतही जोपासली गेली. ज्या शिवसेनेने गेल्या दोन निवडणुकीत बंडखोरी केली त्यांना त्याचा कधीच फायदा झाला नाही हे खरे असले तरी, त्यांच्या बंडखोरीमुळे दुस-या उमेदवाराचे नुकसान झाल्याचे आजवरच्या लढतीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात होणा-/या पंचरंगी लढतीतील सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सेनेच्या बंडखोरीचा लाभ कोणाला तारक व कोणाला मारक ठरतो याकडे मतदारांचे लक्ष लागले होते; मात्र त्याचा कुठलाही परिणाम भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विजयावर झाला नाही.कामगार व मध्यमवर्गीय मतदारांचा भरणा असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा चुरशीची निवडणूक होईल याचे संकेत निवडणूकपूर्व तयारीतूनच मिळत होते. त्यामुळे अपेक्षेनुरूप सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपाने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा तिकीट देऊन जागा राखण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला.या मतदारसंघाने आजपर्यंत एकाच पक्षाची कधीही पाठराखण केलेली नव्हती मात्र या निवडणूकीत ही परंपरा खंडीत झाली आणि मतदारांनी पुन्हा भाजपला कौल दिला. खान्देश व कसमादे येथील मतदारांचा अधिक भरणा असल्यामुळे तेथील राजकीय परिस्थितीचा पश्चिम मतदारसंघावर प्रभाव पडत असतो.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाnashik-pcनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस