शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नाशिक निवडणूक निकाल : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने राखला; सरोज आहिरेंची ३३ हजार मतांनी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:49 IST

Nashik Vidhansabha Election 2019 प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे.

ठळक मुद्दे३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. घोलप यांना आव्हान देण्याची दाखविलेली जिद्द यशस्वी

नाशिक: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात जनतेने मोठे परिवर्तन घडविले आहे. राष्ट्रवादी  कॉँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करणाऱ्या मनपाच्या नगरसेवक सरोज आहिरे यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता केवळ शिल्लक राहिली आहे. मतमोजणीच्या १५ फे-या पूर्ण झाल्या असून आहिरे यांना ७० हजार ६९० मते तर प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे.या मतदारसंघात कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार असलेल्या सरोज आहिरे यांनी घोलप यांना आव्हान देण्याची दाखविलेली जिद्द यशस्वी होताना दिसून येत आहे. अखेरच्या ४ फे-या शिल्लक असून ३५ हजारांपेक्षा अधिक मतांनी आहिरे आघाडीवर आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात घोलप यांना नेहमीच मतविभागणीचा फायदा झालेला आहे किंबहुना त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकांना रिंगणात उतरवून तशी राजकीय खेळी यशस्वी करूनही दाखविलेली आहे.घोलप यांच्यासमोर उभे राहण्याचा चंग बांधलेल्या सरोज अहिरे यांनी युतीच्या घोषणेनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. अहिरे यांची उमेदवारी देवळालीतील समीकरण बदलवणारी ठरली. अर्थात घोलप यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका त्यांच्यात रुजविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते मात्र ते त्यांनी लिलयापणे पेलल्याचे दिसून येते. बहुतांश ग्रामीण भाग या मतदारसंघाला जोडला असल्यामुळे त्यांची मतदारांपर्यंत पोहचण्यास दमछाक झाली असली तरी त्या मेहनतीचे फळ त्यांना जनतेकडून मिळाले आहे. लक्ष्मण मंडाले यांनाराष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या मुलाच्या पारड्यात पडणारे मतदान अहिरे यांच्यासाठी धोक्याचे मानले जात होते; मात्र जनतेने समीकरण बिघडवू दिले नाही.सर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा या मतदारसंघाचा प्रवास आहे. १९७४ पर्यंत नाशिक-देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रूपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले.१९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपाचे भिकचंद दोंदे यांनी प्रथमच कमळ फुलविले आहे. १९९० मध्ये युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले.--* देवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. यंदा केवळ चारच अपक्ष आहेत तर वंचितच्या प्रभावाची चर्चा नसल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.*घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे पक्ष आलटून-पालटून उभे राहिले, त्याचा लाभ घोलप यांनाच होत गेला. अनुसूचित जातीसाठी राखीव असा हा मतदारसंघ असताना समाजाच्या राजकारणामुळे अन्य उमेदवारांना अपेक्षित मते मिळत नाहीत. यंदा सरोज अहिरे-घोलप यांची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता आहे.मतदारसंघातील कळीचे मुद्दे* नासाका आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रलंबिंत प्रश्न.* बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यास अपयश.* ग्रामीण भागाला तीस वर्षांपासून शाश्वत विकासाची प्रतीक्षा.* पर्यटन, शिक्षण आणि उद्योग प्रकल्प नाही.* व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा मुद्दा.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019devlali-acदेवळालीNashikनाशिकVotingमतदानNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना