शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

नाशिक जिल्हा : वर्षभरात रस्त्यावर ९०० लोकांनी गमाविला प्राण; १हजार ८०० जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:17 IST

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख्या ८३ ने कमी होऊन ९०४वर पोहचली असली तरी अवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले असून ...

ठळक मुद्दे२०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखीअवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले मागील वर्षी अपघातांची संख्या २१९० इतकी होती

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख्या ८३ ने कमी होऊन ९०४वर पोहचली असली तरी अवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग या शासकिय यंत्रणांसोबत प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वय साधून जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्र शोधून काढत त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे उपाययोजना करुन अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीमार्फत देण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून जरी विविधप्रकारे उपाययोजना व अभियानांमार्फत लोकजागृतीवर भर दिला जात असला तरी अद्याप पाहिजे तसे यश या शासकिय यंत्रणेला प्राप्त झालेले नाही. केवळ आठ टक्क्यांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण मागील वर्षी कमी झाले तर अपघातांचा आकडा बघितला असता त्यामध्येही खूप तफावत आढळून येत नाही. २०१६ साली ३ हजार ३८ अपघात नाशिक जिल्ह्यात विविध भागांमध्ये झाले तर मागील वर्षी अपघातांची संख्या २१९० इतकी होती. एकूण ८४८ अपघात मागील वर्षी कमी झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रयत्नांना काही अंशी यश येताना जरी दिसत असले तरी चालू वर्षात ही संख्या अजून कमी करण्याचे आव्हान आहे.

संगणकीकृत परवाना चाचणीशहरी व ग्रामिण भागात संगणकीकृत उमेदवारांना वाहन परवाना चाचणीला सामोरे जावे लागत आहे. या चाचणीमुळे ज्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती व अभ्यास आहे, अशाच उमेदवार चाचणीमध्ये पात्र ठरत आहे. या संगणकीकृत प्रणालीद्वारे ग्रामिण भागात अद्याप टॅबलेटद्वारे १८ हजार ३४७ अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये चौदा हजार १४७ अर्जदार उत्तीर्ण होऊ शकले.३५ हजार वाहनांना योग्यता प्रमाणपत्रप्रादेशिक परिवहन विभागाने नादुरस्त वाहनांमुळे रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी यंत्र दोन वर्षांपासून सुरू केले आहे. यामाध्यमातून सुमारे ६६ हजार ५६२ वाहने तपासण्यात आली. त्यापैकी ३५ हजार वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातhighwayमहामार्ग