शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:05 IST

तिघांच्या नावांवर एकमत : पाच उमेदवारांचा माघारीचा निर्णय

ठळक मुद्देतीन जागांकरीता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून आठपैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरोधसुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरीता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून आठपैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. गुरुवारी (दि.२५) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी करतील.नाशिक शाखेतून तीन जागांसाठी शाखेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य राजेंद्र जाधव, नाट्यलेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, दीपक मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायधनी, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बुधवारी (दि.२४) नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या कार्यालयात उमेदवारांची एकत्रित बैठक होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, सुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर एकमत झाले. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम यांनी सांगितले, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पाच उमेदवार प्रा. रविंद्र कदम, राजेंद्र जाधव, दत्ता पाटील, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांनी स्वेच्छेने आपले माघारी अर्ज शाखेकडे दिले आहेत. सुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पाचही उमेदवारांचे माघारी अर्ज निवडणूक अधिका-याकडे सुपुर्द केले जातील. रंगकर्मींमध्ये कटुता असू नये आणि शाखेचाही निवडणूक खर्च वाचावा यासाठी बिनविरोध निवडीसाठी संबंधित उमेदवारांनी सहकार्यभाव दाखविला. सुनील ढगे हे गेल्या पंचवार्षिक काळात मध्यवर्ती शाखेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकीर्दीत शाखेला अनेक उपक्रम राबविता आले. सुरेश गायधनी यांनी सुद्धा यापूर्वी मध्यवर्ती शाखेवर काम केले असल्याने त्यांचा दीर्घ अनुभव आहे. सचिन शिंदे यांच्यासारखा प्रतिभावान कलावंत, दिग्दर्शक या निमित्ताने मध्यवर्ती शाखेवर जाणार आहे. त्यामुळे, येत्या पाच वर्षात नाशिक शाखेला उत्तमोत्तम काम करण्याची संधी लाभणार असल्याचेही प्रा.कदम यांनी सांगितले. शाखेची पहिल्यांदाच बिनविरोध निवड होत असल्याचेही प्रा. कदम यांनी सांगितले. यावेळी, सुनील ढगे, दत्ता पाटील, सचिन शिंदे, गिरीश गर्गे तसेच सुरेश गायधनी यांचे प्रतिनिधी कुंतक गायधनी आणि प्रफुल्ल दीक्षित यांचे प्रतिनिधी म्हणून राजेश भुसारे उपस्थित होते.उद्या माघारीचा दिवसमध्यवर्ती शाखेची निवडणूक ४ मार्चला होणार असून गुरुवारी (दि.२५) अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. शाखेकडे पाचही उमेदवारांनी आपले माघारी अर्ज दिल्याने ते निवडणूक अधिका-याकडे जमा केले जाणार आहेत. दरम्यान, नाशिकप्रमाणेच धुळे-जळगाव आणि अहमदनगर शाखेचीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुनील ढगे यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातून सात उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक