शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:19 IST

या प्रकरणात संस्था चालक आणि शिक्षक, अधिकारी अशी संगनमताची साखळी कार्यरत असल्याचे चौकशीत समोर आले. 

बोगस शालार्थ आयडी काढून त्याद्वारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विभागात तब्बल ७९ गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. या प्रकरणाची विभागाने इतकी धास्ती घेतली आहे की, त्या प्रकरणाची सुनावणी थेट शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.५) एसएससी बोर्डाच्या कार्यालयात घेण्यात आली. यात काय घडले हे गुलदस्त्यात असले तरी काही मुख्याध्यापक, कर्मचारी यांना अधिक चौकशीसाठी पुणे येथे बोलावण्यात आल्याने या प्रकरणातील गोंधळ अधिकच वाढला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दरम्यान, याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. बोगस शालार्थ आयडी काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी विभागातील शिक्षक, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

त्यानंतर असाच प्रकार नागपूरला उघड झाल्यानंतर राज्यभर त्या प्रकरणी तपासणी सुरू झाली. या प्रकरणात संस्था चालक आणि शिक्षक, अधिकारी अशी संगनमताची साखळी कार्यरत असल्याचे चौकशीत समोर आले. 

आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी?

नाशिक विभागातील माध्यमिक विभागाचा गेल्या १२ वर्षातील कारभार यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चौकशीत नाशिकमधील आणखी प्रकरणे उघड होणार अशी चर्चा शिक्षण विभागात सुरू असतानाच विभागातील काही आजी-माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांची शिक्षण उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी झाल्याचे समजते.

 नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चारही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरतीचे प्रकार उघड झाल्यानंतर संबंधितांचे धाबे दणाणले होते. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शिक्षण विभागाने चौकशीचे पाऊल उचलले आहे. 

त्यानुसार सोमवारी शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली आहे. याकरिता माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी सकाळपासून हजर असल्याचे कळते. 

आणखी एक कुरण ?

बोगस आयडी काढून शासनाचे करोडो रुपये लाटल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचा कारभार तरी पारदर्शक होईल का, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. या प्रकरणी इथे चौकशी झाल्यानंतर पुन्हा पुणे येथे पाचारण करण्याची काय गरज आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने चालण्यासाठी आता शिक्षक, कर्मचाऱ्यांनाच कठोर भूमिका घ्यावी लागेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद

गेल्या बारा वर्षातील शिक्षण विभागातील कारभार बघता शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्यातील उघड न झालेले लागेबांधे या घोटाळ्याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात असून, वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे हा प्रकार वाढत असल्याचे आरोप शिक्षकांकडून होत आहेत. या संदर्भात अधिकारी उपलब्धच होत नसल्याने अधिकृत माहिती देण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणfraudधोकेबाजीEducation Sectorशिक्षण क्षेत्र