शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

‘नमामि गोदा’ ही सरकारी योजना नव्हे लोकचळवळ व्हावी; पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 23:11 IST

नाशिक- गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी नमामि गोदा सारखे अभियान केंद्र सरकारने सुरू करावे यासाठी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे केंद्र शासनाला साकडे घालणार आहेत. तथापि, नाशिकमध्ये या अगोदरच पर्यावरण प्रेमींनी नमामि गोदा ही लोकचळवळ सुरू केली आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी सरकारी योजना नव्हे तर लोकचळवळच झाली पाहिजे असे मत नमामि गोदा फांऊडेशनचे संस्थापक आणि पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांनी केले.

ठळक मुद्देमहापालिकेने अचूक काम करावेनदीपात्रात शासकिय अतिक्रमण नको

नाशिक- गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी नमामि गोदा सारखे अभियान केंद्र सरकारने सुरू करावे यासाठी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे केंद्र शासनाला साकडे घालणार आहेत. तथापि, नाशिकमध्ये या अगोदरच पर्यावरण प्रेमींनी नमामि गोदा ही लोकचळवळ सुरू केली आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी सरकारी योजना नव्हे तर लोकचळवळच झाली पाहिजे असे मत नमामि गोदा फांऊडेशनचे संस्थापक आणि पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांनी केले.

पंडित यांनी गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त उच्चाधिकार समितीचे सदस्य म्हणून ते काम करीत आहेत.

प्रश्न- महापौर सतीश कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पीय सभेत नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान केंद्रशासनाने राबबावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याबाबत काय सांगाल?पंडित- नमामि गोदा ही चळवळ शासनाने सुरू करण्याच्या आत लोकांनीच सुरू केली आहे. आणि एखादी चळवळ लोक चालवतात तेव्हा ती अधिक व्यापक होते आणि परिणामकारकता अधिक असते. मुळातच केंद्र सरकारने नमामि गंगा हे अभियान सुरू केले, त्यातून कोट्यावधी रूपये खर्च करून देखील गंगा प्रदुषणमुक्त झालेली नाही. कोरोनामुळे ती झाली असेल तेवढाच दिलासा मिळाला आहे. नमामि गंगा या अभियानाविषयीच त्यामुळे मतभेद असताना आता नमामि गोदा म्हणून काय होणार? सरकारने नदी पुनरूज्जीवनासाठी पायाभूत कामे केली पाहिजे.

प्रश्न- महापौर आणि महापालिकेकडून यासंदर्भात काय अपेक्षीत आहे?पंडित- महापालिकेसारख्या पालक संस्थेकडे यासंदर्भातील खूप दायीत्व आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील बऱ्याच गोष्टी झालेल्या नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत झालेल्या उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष महेश झगडे यांनी मलनिस्सारणाचे आॅडीट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते अद्याप झालेले नाही. रिवर आणि सिव्हर वेगळे करण्याचे काम देखील प्रलंबीत आहे. महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्र अत्यंत जुने असून ख-या अर्थाने गोदावरी नदीच्या प्रदुषणाला तेच कारणीभूत ठरत आहे. त्यात नवीन निकषानुसार दहाच्या आत बीओडी असावे यासाठी नुतनीकरण करण्याची गरज आहे. पावसाळी गटार योजनेत गटारीचे पाणी सोडले जात आहेत. ते थांबविण्याची गरज आहे.

प्रश्न- स्मार्ट सिटीत ब-यापैकी गोदावरी शुध्दीकरण होईल असे सांगितले जात आहे.पंडित- स्मार्ट सिटी विकासासाठी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विकासाची व्याख्याच एकदा केली पाहिजे. स्मार्ट सिटीत अद्याप गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी काहीच नाही उलट निळ्या रेषेत बांधकाम करून अतिक्रमण केले जात आहे. निळ्या पुररेषेत खासगी बांधकाम करू नये यासाठी शासकिय यंत्रणांनी दक्षता घेण्याची गरज असताना येथे मात्र शासनच अतिक्रमण करीत असून ते थांबविले पाहिजे.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीpollutionप्रदूषण