शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने पंचनाम्यांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:03 IST

नाशिक : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना ते अचुक करण्यासाठी वैयक्तिक आणि पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्रपणे ...

नाशिक: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना ते अचुक करण्यासाठी वैयक्तिक आणि पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्रपणे पंचनामे करावे लागत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचनामे पुर्ण करण्यात आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार हेक्टरवरील पंचनामे पुर्ण करण्यात आली आहेत.जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५० टक्के पीकांचे नुकसान झाल्याचा म्हणजेच ३ लाख २६ हजार हेक्टरवरील पीकांचे नुकसान झालेले आहे. गाव खेड्यांबरोबरच दुर्गम भागातही पीकांचे मोठे नुकसान झाले आहेच शिवाय नुकसानीची क्षेत्र मोठे असल्यामुळे पंचनामे करतांना काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. शिवाय कर्मचाºयांची संख्याही कमी पडत असल्यामुळे पंचनामे पुर्ण करण्यास अपेक्षित गती प्राप्त झालेली नाही. अर्थात पंचनामे हे शनिवार पर्यंत पुर्ण होतील असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.पीकांचे पंचनामे करतांना रितसरत वैयक्तिक पंचनामे केले जात आहेत. याशिवाय जिरायती, बागायती आणि फळपीके अशा तीन टप्प्यात नुकसानीचे पंचनामे करावे लागत असल्यामुळे निर्धारित वेळेत पंचनामे पुर्ण होऊ शकले नाही. शासनाने सहा तारखेपर्यंत पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. नाशिक जिल्ह्यातील पंचनामे अद्यापही सुरूच आहेत. अत्तापर्यंत १ लाख ९२ हजार हेक्टरवरील पंचनामे पुर्ण झाले असून अजून दिड लाख हेक्टवरील पीकांचे पंचनामे करणे बाकी आहे. दोन दिवसात सर्व पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी