शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:57 IST

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटर आॅडिटच्या साहाय्याने पाणीपुरवठा विषयक व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे शहरात सुमारे ४१ टक्के पाणीगळती अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे महापालिका प्रशासनाला वॉटर आॅडिटचा अहवाल

नाशिक : महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटर आॅडिटच्या साहाय्याने पाणीपुरवठा विषयक व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे परीक्षण करण्यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले होते. त्यानुसार, दीड वर्षांपासून वॉटर आॅडिटचे काम सुरू होते. अखेर, संबंधित एजन्सीने महापालिका प्रशासनाला वॉटर आॅडिटचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, शहरात सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. त्यात, प्रामुख्याने, पाइपलाइनसह जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ या ठिकाणी सुमारे १८ टक्क्यांच्या आसपास गळती असून, उर्वरित गळती ही विनामहसुली आहे. वॉटर आॅडिटच्या अहवालाचा आता अभ्यास करून त्यादृष्टीने अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. सदर अहवाल स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीला पाठविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाण भागातील पाइपलाइन बदलणे, चोवीस तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्मार्ट मीटर बसविणे आदी विविध कामे करण्याचे प्रस्तावित आहेत.  नवीन वर्षात वॉटर आॅडिटच्या अहवालानुसार प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचेही चव्हाणके यांनी सांगितले. दरम्यान, वॉटर आॅडिटबरोबरच एनर्जी आॅडिटही करण्यात येत असून, त्याचा अहवालही या महिन्याच्या अखेरीस सादर होण्याची शक्यता आहे. प्रशासनापुढे आव्हान नाशिक शहराला गंगापूर व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सर्वसाधारणपणे गंगापूर धरणातून प्रतिदिन ४३० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. शहरात आजमितीला १०९ जलकुंभ असून, चार जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाण्याची वितरण व्यवस्था चालविली जाते. मात्र, पाणीपुरवठा वितरणात सुमारे ४० टक्के गळती होत असल्याचा आरोप महासभांमध्ये लोकप्रतिनिधी वारंवार करत आले आहेत. जेव्हा जेव्हा पाणीपट्टीचे दर वाढविण्याचे प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला येतात त्यावेळी पाणीगळती रोखण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाते. आता वॉटर आॅडिटनुसार पाणीगळती रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी