शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

इच्छुकांच्या नजरा लागल्या मुंबईकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 01:06 IST

कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.

नाशिक : कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले असताना सर्वाधिक चुरस सेना-भाजपमध्ये असल्याने नाशिककरांच्या नजरा मुंबईतून होणाऱ्या घोषणेकडे लागले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे पाचच दिवस राहिल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत भाजप आणि सेनेने काही निकष निश्चित केले असल्याने या निकषात बसणाऱ्यांनाच उमेदवारी मिळणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. क्षणाक्षणाला बदलणाºया राजकीय परिस्थितीवर दोन्ही पक्षांकडून भूमिका घेतली जात असल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सेना-भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना सद्यस्थितीत कोणतीही शाश्वती देता येणे शक्य नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांनासून नाशिकमधील अनेक इच्छुक मुंबईत तळ ठोकून असून, आपापल्या राजकीय संपर्काचा वापर करीत तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत.त्या तुलनेत कॉँग्रेस आघाडीच्या इच्छुकांमध्ये चुरस कमी असल्यामुळे तिकिटासाठी ठराविक नावांपैकीच नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. काहींना शब्दही देण्यात आल्यामुळे त्यांच्या नावाची केवळ अधिकृत घोषणा होण्याचे बाकी आहे. आघाडीची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर होणार असल्यामुळे पहिल्या यादीत कुणाचे नाव असू शकेल याकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. जिल्ह्यातील ज्या जागांच्या अदलाबदलीची चर्चा आहे, त्या जागांकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून आहे.मुंबईत रविवारी मनसेच्या कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नाशिकमधील नावांच्या बाबतीतील उत्सुकताही ताणली गेली आहे.वंचित आघाडीसह अन्य राजकीय पक्षांनीदेखील काही नावे निश्चित केली आहेत. या पक्षाच्या इच्छुक उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी अर्जदेखील नेले आहेत. त्यामुळे वंचितच्या उमेदवारीविषयी फारसा सस्पेन्स नसला तरी ऐनवेळी इनकमिंग झाले तर नावात बदल होतो का एवढीच काय ती उत्सूकता आहे. मनसेचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. काही नावे चर्चेत असली तरी अंतिमक्षणी कोणते नाव समोर येणार याबाबतची उत्सुकता नक्कीच आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस