शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:39 IST

वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासू पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्गावर पहाटे अपघात विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत वन्यजीवांचा वावर बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा

नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांचा बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचा-यांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला.इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत विल्होळी, वाडीव-हे, गोंदे, पाडळी, मुंढेगाव, घोटी या भागात बिबट्याचा वावर आढळतो. भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात सहा महिन्यांचा बछडा मुंढेगाव शिवारातून महामार्ग ओलांडत असतान अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ बिबट्याचे शव महामार्गावरुन बाजूला करत रस्त्याच्या कडेला आणून ठेवले. घटनेची माहिती त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना कळविण्यात आली. तत्काळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी-क र्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा केला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले. तत्काळ बिबट्याचा मृतदेह वनकर्मचा-यांनी ताब्यात घेऊन वाहनातून अंत्यसंस्कारासाठी हलविला.महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनाच्या वेगमर्यादा प्रचंड वाढली असून या भागात वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा वावर असल्याचा सावधानतेचा इशारा देणारे फलकही अद्याप लावण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना याबाबत कुठलीही माहिती मिळत नाही. अचानकपणे महामार्गावर रात्री, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास बिबट्या, रानमांजर, तरस यांसारखे वन्यजीव महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडतात.

महामार्गावरुन मार्गस्थ होताना वेगावर नियंत्रण ठेवणे हे वाहनचालकांसह वन्यजीवांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. वाहनचालकांनी वन्यजीव अचानकपणे रस्त्यावर दिसल्यास किंवा वाहनाच्या प्रकाशात त्याचे डोळे लख्ख स्वरुपात चमक ल्यास वेग कमी करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन अपघातात वन्यजीवांचा बळी जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासून पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे. जेणेकरुन वाहनचालकांना वन्यजीवांची वावर असल्याबाबतची माहिती मिळण्यास मदत होईल. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवhighwayमहामार्गleopardबिबट्याAccidentअपघातDeathमृत्यू