शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

मराठा आरक्षणासंदर्भात २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार : खासदार संभाजी राजे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:16 IST

मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासंदर्भात तज्ज्ञांशी संवाद साधणार, राज्यभर दौरा करून जाणून घेणार प्रतिक्रिया, 27 मे रोजी भूमिका स्पष्ट करणार - खासदार संभाजी राजे

नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.कोरोना संकटात कुटुंबीयांना गमावलेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासोबतच मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आरक्षणाविषयी मत जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (दि. २०) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.कोरोनाच्या संकटात राज्यासाठी पुढील सहा-सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण संयमाची भूमिका घेतली असून माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत व्यक्त करतानाच यासंदर्भात राज्याच्या विविध भागांतील समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून २७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.

आक्रमक होण्याची ही वेळ नाहीमाझ्या संयमाच्या भूमिकेविषयीही काही जणांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु, सध्या आक्रमक होण्याची वेळ नाही, माणसं जगली तर आरक्षासाठी लढा देता येईल, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. सत्ताधारी व विरोधातील नेते एक-दुसऱ्याविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्याच्याशी मराठा समाजाला काहीच घेणेदेणे नाही. आरक्षणाविषयी मार्ग काय काढणार आहात ते समाजाला सांगा, असे आ‌वाहनही त्यांनी सरकारी व विरोधी पक्षातील नेत्यांना केले. दरम्यान, पंतप्रधानांना चारदा पत्र लिहूनही त्यांची वेळ मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, १०२ व्या घटनादुरुस्तीविषयीही २७ मे रोजी पत्रकार परिषदेत बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती