शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

मध्यम सरी दिवसभर कोसळल्या;१५.६ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 6:38 PM

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली.

ठळक मुद्देया हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊसगंगापूर धरण ७२ टक्के भरले२४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेर्पंत कायम होता. दिवसभरात १५.६ मिमी पावसाची नोंद झाली तर मागील ३२ तासांत शहरात ३९मि.मीपर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता.शहर व परिसरात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या सरींचा संततधार वर्षावाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. घाटक्षेत्रांमधील परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार व सोमवारी जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या तालुक्यांत मुसळधार तर शहरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार शहरात दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होत होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.६ मिमी इतका पाऊस पडला. तसेच शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली.पहाटेपासून सकाळपर्यंत पावसाचा काहीसा जोर कमी होता; मात्र सकाळी साडेआठवाजेपासून पावसाचा जोर चांगला वाढला. मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होऊ लागल्याने तीन तासांत ७.४ मिमी पाऊस नोंदविला गेला. दिवसभरात हा ‘स्पेल’ वगळता सायंकाळपर्यंत पावसाचे प्रमाण तसे कमी राहिले. साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पावसाने जवळपास उघडीप दिली होती. या कालावधीत केवळ २.६ मिमी पाऊस शहरात झाला. दुपारनंतर पुन्हा जोर वाढल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५.६ मिमीपर्यंत पाऊस पडला.वर्दळ मंदावली; वाहतूक सुरळीतमहिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे शासकिय कार्यालयांसह बॅँकांना सुटी होती तसेच दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव सुरूच राहिल्याने शहरातील रस्त्यांवर वर्दळ मंदावलेली होती. तसेच वाहतूकीवरही काही प्रमाणा पावसाचा परिणाम झाला; मात्र वाहनांची संख्या कमी राहिल्याने कोंडीला निमंत्रण मिळाले नाही.गंगापूर धरण ७२ टक्के भरलेगंगापूर धरणाचा जलसाठा ७२ टक्क्यांवर शनिवारी सायंकाळी पोहचला होता. जलपातळी ४ हजार ५४ दलघफूपर्यंत वाढली असून ३४५ दलघफूपर्यंत नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. पाणलोट क्षेत्रात जोर‘धार’ सुरू राहिल्याने साठ्यात वाढ झाली. त्र्यंबकमध्ये सर्वाधिक ११२ तर अंबोलीत ६१ मिमीपर्यंत पाऊस पडला.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसgangapur damगंगापूर धरण