शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:00 IST

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. राज ठाकरेंनी केलेली कामे टिकवता आलेली नाहीत, असे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज्यात शिक्षक, शेतकरी, असे अनेकांचे प्रश्न आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकीय लोक राजकारण करतात. मात्र जनतेचे हित जपले गेले पाहिजे. कुंभमेळा काही वर्षांवर आलेला असतांना शासन म्हणते कामे झाली. पण दिसत नाही. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल पण शहरातील उद्ध्वस्त झालेले प्रकल्पही नव्याने सुरू होतील. बरे झाले आम्हाला नाशिककरांनी नाकारले. त्यानिमित्ताने का होईना त्यांना कळले सत्ता हातात असलेल्यांनी दत्तक शहराची काय अवस्था केली, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिकमध्ये उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चापूर्वी पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली. 

राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक

राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. नाशिकवर राज ठाकरे यांचे प्रेम कायम आहे. मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेले असले तरी राज ठाकरे यांचे प्रेम कमी झालेले नाही. नाशिकचा विकास होत नाही, मग स्वतःला कर्तबगार समजणारे गिरीश महाजन काय करत आहेत, अशी विचारणा नांदगावकर यांनी केली. नाशिक दत्तक घेऊन काय केले? नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. नाशिकचे लोक तुम्हाला विचारत आहेत की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचे काय झाले? अनेक प्रकल्प नाशिकमध्ये साकारण्यात आले. परंतु, ते प्रकल्प आज उद्ध्वस्त झाले जबाबदार कोण? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती, तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली. राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवली का? आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे? लोकांनी आम्हाला नाकारले तेही चांगले केले. कारण, ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केले, हे लोकांना कळले, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे