शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:00 IST

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. राज ठाकरेंनी केलेली कामे टिकवता आलेली नाहीत, असे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज्यात शिक्षक, शेतकरी, असे अनेकांचे प्रश्न आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकीय लोक राजकारण करतात. मात्र जनतेचे हित जपले गेले पाहिजे. कुंभमेळा काही वर्षांवर आलेला असतांना शासन म्हणते कामे झाली. पण दिसत नाही. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल पण शहरातील उद्ध्वस्त झालेले प्रकल्पही नव्याने सुरू होतील. बरे झाले आम्हाला नाशिककरांनी नाकारले. त्यानिमित्ताने का होईना त्यांना कळले सत्ता हातात असलेल्यांनी दत्तक शहराची काय अवस्था केली, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिकमध्ये उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चापूर्वी पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली. 

राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक

राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. नाशिकवर राज ठाकरे यांचे प्रेम कायम आहे. मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेले असले तरी राज ठाकरे यांचे प्रेम कमी झालेले नाही. नाशिकचा विकास होत नाही, मग स्वतःला कर्तबगार समजणारे गिरीश महाजन काय करत आहेत, अशी विचारणा नांदगावकर यांनी केली. नाशिक दत्तक घेऊन काय केले? नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. नाशिकचे लोक तुम्हाला विचारत आहेत की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचे काय झाले? अनेक प्रकल्प नाशिकमध्ये साकारण्यात आले. परंतु, ते प्रकल्प आज उद्ध्वस्त झाले जबाबदार कोण? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती, तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली. राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवली का? आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे? लोकांनी आम्हाला नाकारले तेही चांगले केले. कारण, ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केले, हे लोकांना कळले, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे