शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:00 IST

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. राज ठाकरेंनी केलेली कामे टिकवता आलेली नाहीत, असे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज्यात शिक्षक, शेतकरी, असे अनेकांचे प्रश्न आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकीय लोक राजकारण करतात. मात्र जनतेचे हित जपले गेले पाहिजे. कुंभमेळा काही वर्षांवर आलेला असतांना शासन म्हणते कामे झाली. पण दिसत नाही. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल पण शहरातील उद्ध्वस्त झालेले प्रकल्पही नव्याने सुरू होतील. बरे झाले आम्हाला नाशिककरांनी नाकारले. त्यानिमित्ताने का होईना त्यांना कळले सत्ता हातात असलेल्यांनी दत्तक शहराची काय अवस्था केली, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिकमध्ये उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चापूर्वी पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. शेतमालाला भाव, पीक विमा असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शिक्षकांचा प्रश्न अजून सुटला नाही, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली. 

राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक

राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. नाशिकवर राज ठाकरे यांचे प्रेम कायम आहे. मधल्या काळात नाशिककरांच प्रेम काहीस कमी झालेले असले तरी राज ठाकरे यांचे प्रेम कमी झालेले नाही. नाशिकचा विकास होत नाही, मग स्वतःला कर्तबगार समजणारे गिरीश महाजन काय करत आहेत, अशी विचारणा नांदगावकर यांनी केली. नाशिक दत्तक घेऊन काय केले? नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. नाशिकचे लोक तुम्हाला विचारत आहेत की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचे काय झाले? अनेक प्रकल्प नाशिकमध्ये साकारण्यात आले. परंतु, ते प्रकल्प आज उद्ध्वस्त झाले जबाबदार कोण? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता आमच्या ताब्यात नव्हती, तरी राज ठाकरेंनी चांगली कामे केली. राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवली का? आज त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे? लोकांनी आम्हाला नाकारले तेही चांगले केले. कारण, ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांनी काय केले, हे लोकांना कळले, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे