शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

निवडणूक लढवण्याबाबतच पक्षीय संभ्रम असल्याने मनसे इच्छुक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:11 IST

पक्षीय संघटनाची अवस्था फारशी चांगली नसताना तसेच पक्षाच्या बाजूने कोणतेही वारे वाहत नसतानादेखील मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी करीत होते.

नाशिक : पक्षीय संघटनाची अवस्था फारशी चांगली नसताना तसेच पक्षाच्या बाजूने कोणतेही वारे वाहत नसतानादेखील मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी करीत होते. मात्र, शुक्रवारी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची ‘कृष्णकुंज’वर झालेल्या बैठकीत यंदाची निवडणूक लढवायची की नाही त्यावरच खल होऊन ती बैठकदेखील निर्णयाविनाच पार पडल्याने नाशिकमधील मनसेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला नाशिकने राज्यात सर्वप्रथम महापालिकेवर सत्ता दिली. तसेच नाशिक महानगरातून २००९ साली तब्बल तीन आमदार निवडून देण्याची किमया करून दाखवली. त्याच नाशिकमध्ये दशकभरानंतर आमदारकीची निवडणूक लढवायला फारसे कुणी उत्सुक नाहीत. त्यातच जे विद्यमान पदाधिकारी उत्सुकता दाखवून रिक्षांवर पक्षाचे झेंडे आणि आपल्यासह पक्ष नेतृत्वाचे फोटो फिरवत वातावरण निर्मिती करीत आहेत, अशा इच्छुकांच्या उत्साहावर पाणी फेरण्याचे काम पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून होत असल्याची चर्चा त्यानिमित्ताने नाशकात सुरू झाली आहे. नाशिक महानगरातील काही जागा आणि जिल्ह्णातील काही जागांवर पक्षीय उमेदवार उभा करण्यावरून पदाधिकारी प्रयत्नशील होते. मात्र, पक्षीय स्तरावरच निवडणूक लढवावी किंवा लढवू नये, याबाबत सुस्पष्टता नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.संभ्रमावस्था घातकविधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यास दोन-चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना मनसेसारख्या पक्षाने अद्यापही ठाम निर्णय न घेणे अनाकलनीय आहे. शुक्रवारी कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक लढवायची की नाही? याबाबतच चर्चा झाली. ती चर्चादेखील निर्णयाप्रत पोहोचू न शकल्याने आचारसंहिता चार दिवसांवर आल्याने ही संभ्रमावस्था पक्षासाठी घातक असल्याची कुजबुजदेखील यानिमित्ताने सुरू झाली आहे.लोकसभेचा कित्ता गिरवणार का?लोकसभेला मनसेने राज्यात एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध सभांचा धडका उडवत मनसेने एकाकीपणे किल्ला लढवला होता. त्यावेळी राज ठाकरे यांची भाषणे गाजली, मात्र जनतेने भाजपलाच मतदान केल्याने मनसे फॅक्टरचा फायदा झाला नसल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी ठाकरे यांच्या भाषणांची चर्चा झाली; पण पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही कामच नव्हते. विधानसभेलादेखील तोच कित्ता गिरवण्यात येणार असेल तर इच्छुकांनी काय करायचे असा संंभ्रम त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMNSमनसे