शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

ज्याची कामगिरी दमदार तोच होणार आमदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:57 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपच्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडले आहे. भाजपाने दोन सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर केले असून, त्यातील निर्णयाच्या आधारे तब्बल २५ आमदारांना डच्चू मिळणार असल्याने नाशिकमधील सर्वच आमदार धास्तावले आहेत.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपच्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडले आहे. भाजपाने दोन सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर केले असून, त्यातील निर्णयाच्या आधारे तब्बल २५ आमदारांना डच्चू मिळणार असल्याने नाशिकमधील सर्वच आमदार धास्तावले आहेत. ‘जो दमदार तोच आमदार’ अशी भाजपची भूमिका असल्याने संबंधित सर्वच जण अडचणीत आले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असतानाही भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या. त्यात एक देवळा-चांदवड मतदारसंघ, त्यानंतर नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य या जागांचा समावेश आहे. या आमदारांचे रिपोर्ट कार्ड गेल्यावर्षीच तयार करण्यात आले होते त्यात अनेकांची कामगिरी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत गेली होती. त्यावेळीदेखील आमदारांच्या मतदारसंघात पक्षाच्या वतीने खासगी एजन्सी नेमून सर्व्हे करण्यात आला होता. त्यात कोणाची काय कामगिरी उघड झाले नसले तरी जिल्ह्यातील आमदारांनी मात्र आपला रिपोर्ट चांगलाच असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरदेखील आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करण्यात आला आहे.भाजपने या केलेल्या सर्व्हेनुसार आता राज्यातील २५ आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांनी स्पष्ट केले असून, त्यात कोण कोण आहेत याचा मात्र उलगडा उमेदवारी देतानाच होणार आहे. नाशिक शहरातील तिन्ही आमदारांची पक्षांतर्गत कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. पक्षातील राजकारण, महापालिकेतील वर्चस्वावरून वाद यामुळे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री देखील त्रस्त झाले होते. ग्रामीण भागातील एकमेव आमदाराबाबतदेखील वेगळी स्थिती नाही. तेथे राजी-नाराजीचे वातावरण तर आहेच, परंतु बहुतांशी इच्छुकांनी आता कितीवेळ थांबायचे? असा प्रश्न सुरू केल्याने या सर्वच आमदारांकडे स्पर्धा वाढली आहे. त्यातच पक्षाने आता जो दमदार तोच आमदार अशी भूमिका घेतल्याने विद्यमान आमदारांची चिंता वाढली आहे.लोकसभेतील कामांचे देखील मूल्यमापनलोकसभा निवडणुकीतदेखील भाजपने एका खासगी एजन्सी मार्फत पक्षाच्या उमेदवारासाठी कोणी काय काम केले, त्याचप्रमाणे बुथ उभारले होते किंवा नाही अशा प्रकारची तपासणी केली होती. पक्षातील निरीक्षकांना पाठविल्यानंतर डावे उजवे होऊ शकत असल्याने त्यांच्याऐवजी भाजप सातत्याने खासगी एजन्सीवरच भर देत आहे.एकदा नव्हे दोनदा सर्व्हेभाजपने एका एजन्सीमार्फत आमदारांच्या कामगिरीचा सर्व्हे केला असला तरी त्याएका सर्व्हेत दोष असतील तर पुन्हा अडचण येऊ नये यासाठी पक्षाने पुन्हा त्यावर आणखी एका त्रयस्थ एजन्सीमार्फत वॉच ठेवून सर्व्हे केला आहे. त्यामुळे हा सर्व्हे पक्का ठरला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा