शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
2
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
4
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
5
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
6
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
7
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
8
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
9
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
10
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
11
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
12
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
13
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
14
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
15
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
16
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
17
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
18
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
19
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्याची कामगिरी दमदार तोच होणार आमदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:57 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपच्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडले आहे. भाजपाने दोन सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर केले असून, त्यातील निर्णयाच्या आधारे तब्बल २५ आमदारांना डच्चू मिळणार असल्याने नाशिकमधील सर्वच आमदार धास्तावले आहेत.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपच्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडले आहे. भाजपाने दोन सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर केले असून, त्यातील निर्णयाच्या आधारे तब्बल २५ आमदारांना डच्चू मिळणार असल्याने नाशिकमधील सर्वच आमदार धास्तावले आहेत. ‘जो दमदार तोच आमदार’ अशी भाजपची भूमिका असल्याने संबंधित सर्वच जण अडचणीत आले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असतानाही भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या. त्यात एक देवळा-चांदवड मतदारसंघ, त्यानंतर नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य या जागांचा समावेश आहे. या आमदारांचे रिपोर्ट कार्ड गेल्यावर्षीच तयार करण्यात आले होते त्यात अनेकांची कामगिरी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत गेली होती. त्यावेळीदेखील आमदारांच्या मतदारसंघात पक्षाच्या वतीने खासगी एजन्सी नेमून सर्व्हे करण्यात आला होता. त्यात कोणाची काय कामगिरी उघड झाले नसले तरी जिल्ह्यातील आमदारांनी मात्र आपला रिपोर्ट चांगलाच असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरदेखील आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करण्यात आला आहे.भाजपने या केलेल्या सर्व्हेनुसार आता राज्यातील २५ आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांनी स्पष्ट केले असून, त्यात कोण कोण आहेत याचा मात्र उलगडा उमेदवारी देतानाच होणार आहे. नाशिक शहरातील तिन्ही आमदारांची पक्षांतर्गत कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. पक्षातील राजकारण, महापालिकेतील वर्चस्वावरून वाद यामुळे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री देखील त्रस्त झाले होते. ग्रामीण भागातील एकमेव आमदाराबाबतदेखील वेगळी स्थिती नाही. तेथे राजी-नाराजीचे वातावरण तर आहेच, परंतु बहुतांशी इच्छुकांनी आता कितीवेळ थांबायचे? असा प्रश्न सुरू केल्याने या सर्वच आमदारांकडे स्पर्धा वाढली आहे. त्यातच पक्षाने आता जो दमदार तोच आमदार अशी भूमिका घेतल्याने विद्यमान आमदारांची चिंता वाढली आहे.लोकसभेतील कामांचे देखील मूल्यमापनलोकसभा निवडणुकीतदेखील भाजपने एका खासगी एजन्सी मार्फत पक्षाच्या उमेदवारासाठी कोणी काय काम केले, त्याचप्रमाणे बुथ उभारले होते किंवा नाही अशा प्रकारची तपासणी केली होती. पक्षातील निरीक्षकांना पाठविल्यानंतर डावे उजवे होऊ शकत असल्याने त्यांच्याऐवजी भाजप सातत्याने खासगी एजन्सीवरच भर देत आहे.एकदा नव्हे दोनदा सर्व्हेभाजपने एका एजन्सीमार्फत आमदारांच्या कामगिरीचा सर्व्हे केला असला तरी त्याएका सर्व्हेत दोष असतील तर पुन्हा अडचण येऊ नये यासाठी पक्षाने पुन्हा त्यावर आणखी एका त्रयस्थ एजन्सीमार्फत वॉच ठेवून सर्व्हे केला आहे. त्यामुळे हा सर्व्हे पक्का ठरला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा