शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाण्याच्या दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 6:53 PM

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

ठळक मुद्दे पेठ तालुक्यातील गावे लागली होरपळू; रोजगाराकरीता भटकंती सुरु

मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या नागरिकांनी आसरा घेतलाय.

मातुलेस्वर पटांगनाचा, दुष्काळात जगण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक शहरात व आजूबाजूच्या परिसरात पेठ हरसूल या तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंब स्थलांतरित होताना दिसताहेत असेच मातोरी गावातील मातुलेस्वर पटांगणात गेल्या दहा बारा दिवसापासून राहत असलेल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असे समजले कि पेठ तालुक्यातील गोटविहीर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची भीषण गैरसोय असल्याने तेथील सुमारे दोनशे लोकांनी आपल्या कुटुंबासह गाव सोडण्याचा निर्णय घेतला, गावात पाणी नाही चार ते पाच किलोेमिटर वरून हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत असल्याने जगायचे कसे व कुटुंबाला जगवायचे कसे हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुटुंबाला घेऊन गावातील तरुण तसेच जेष्ठ मंडळींनी गावातून काढता पाय घेत गावोगावी रोजंदारीवर काम करत उदरनिर्वाह करत आहेत.गावातील बहुतेक नागरिकांची मुले हि शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत परीक्षा संपून बहुतेक मुले सुट्यांमध्ये गावाकडे परतली आहेत, दरसाल सट्टीत मुलांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांच्या मते मुले आश्रमशाळेतच सुखी होते. गावाकडे पाणी नसल्याने आपल्याबरोबरीने त्यांनाही गावोगावी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, आज मातोरीत दिवसभर मिळेल ते काम करून हि मंडळी आपले जगण्याचे साधन करत आहे.१) आमच्या गावापासून दहा ते बारा किलोमीटरवर दमण नदी आहे, पण गावात पाणीपुरवठा नाही. पाण्यासाठी दूर जावे लागत असल्याने आम्ही आमची मुले घेऊन नाशिकला आलो आहोत.- संतोष भसरे (बोर पाडा)२) हंडाभर पाण्यासाठी खूप वनवन करायला लागत असल्याने खूप त्रास होतो, पूर्ण गावात व परिसरात पाणी कमी पडल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा पाऊस तेव्हाच गावाकडे जायचे असे आम्ही ठरविले आहे.- भारती भोये (गोठ विहीर)३) मतदान प्रचारासाठी आलेले पुढारी मतदान झाल्यावर आमच्या अडचणी विसरून जातात, गावाकडे वीज फक्त चार तास राहते पिण्यासाठी पाणी नाही, टॅकर पोहोचायल रस्ते नाही अशी अवस्था असल्याने आम्हाला जगण्याचा पर्याय शोधावा लागतो आहे.- देवराम गालफ (बोरपाडा)