शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

पारा पुन्हा ४० अंशांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:51 IST

शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.

ठळक मुद्देतापमानात वाढ : किमान तापमानही विशीच्या पुढे

नाशिक : शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.मागील महिन्यात नागरिक ांनी तीव्र उन्हाचा सामना केला. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. मे महिन्याच्या प्रारंभी ‘फनी’ वादळामुळे वातावरणात काहीस बदल होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. कमाल तापमानात घट होऊन पारा ३४ ते ३५ अंशांच्या जवळपास राहिला. यामुळे उन्हाच्या झळा कमी जाणवत होत्या. मात्र आठवडाभरापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. पारा चाळिशीकडे सरकू लागल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.शुक्रवारी कमाल तापमान ३७.३ अंश इतके नोंदविले गेले. शनिवारी पारा ३८.९ अंशांपर्यंत पोहचला होता. रविवारी तापमानात वाढ होऊन तापमान ३९ अंशांपुढे सरकले. याबरोबरच किमान तापमानामध्येही वाढ होऊ लागल्याने रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमान मागील दोन दिवसांपासून विशीच्या पुढे सरकले असून, रविवारी सकाळी २२ अंश इतके नोंदविले गेले. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना पुन्हा चाळिशीपार गेलेल्या तापमानाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे शाहरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.दहा वर्षांचा विक्रम यंदा मोडलामागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम यावर्षी मोडला गेला. मागील महिन्यात २७ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते.अशी आहेत उष्माघाताची लक्षणेथकवा जाणवणे, ताप येणे, त्वचा कोरडी होणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोकेदुखी, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, घाम येणे अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा. बर्फाचे पाणी अथवा विविध प्रकारच्या ज्यूसमध्ये बर्फ अतिप्रमाणात टाकून घेणे टाळावे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान