शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पारा पुन्हा ४० अंशांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:51 IST

शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.

ठळक मुद्देतापमानात वाढ : किमान तापमानही विशीच्या पुढे

नाशिक : शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.मागील महिन्यात नागरिक ांनी तीव्र उन्हाचा सामना केला. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. मे महिन्याच्या प्रारंभी ‘फनी’ वादळामुळे वातावरणात काहीस बदल होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. कमाल तापमानात घट होऊन पारा ३४ ते ३५ अंशांच्या जवळपास राहिला. यामुळे उन्हाच्या झळा कमी जाणवत होत्या. मात्र आठवडाभरापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. पारा चाळिशीकडे सरकू लागल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.शुक्रवारी कमाल तापमान ३७.३ अंश इतके नोंदविले गेले. शनिवारी पारा ३८.९ अंशांपर्यंत पोहचला होता. रविवारी तापमानात वाढ होऊन तापमान ३९ अंशांपुढे सरकले. याबरोबरच किमान तापमानामध्येही वाढ होऊ लागल्याने रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमान मागील दोन दिवसांपासून विशीच्या पुढे सरकले असून, रविवारी सकाळी २२ अंश इतके नोंदविले गेले. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना पुन्हा चाळिशीपार गेलेल्या तापमानाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे शाहरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.दहा वर्षांचा विक्रम यंदा मोडलामागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम यावर्षी मोडला गेला. मागील महिन्यात २७ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते.अशी आहेत उष्माघाताची लक्षणेथकवा जाणवणे, ताप येणे, त्वचा कोरडी होणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोकेदुखी, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, घाम येणे अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा. बर्फाचे पाणी अथवा विविध प्रकारच्या ज्यूसमध्ये बर्फ अतिप्रमाणात टाकून घेणे टाळावे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान