शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पारा पुन्हा ४० अंशांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:51 IST

शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.

ठळक मुद्देतापमानात वाढ : किमान तापमानही विशीच्या पुढे

नाशिक : शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.मागील महिन्यात नागरिक ांनी तीव्र उन्हाचा सामना केला. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. मे महिन्याच्या प्रारंभी ‘फनी’ वादळामुळे वातावरणात काहीस बदल होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. कमाल तापमानात घट होऊन पारा ३४ ते ३५ अंशांच्या जवळपास राहिला. यामुळे उन्हाच्या झळा कमी जाणवत होत्या. मात्र आठवडाभरापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. पारा चाळिशीकडे सरकू लागल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.शुक्रवारी कमाल तापमान ३७.३ अंश इतके नोंदविले गेले. शनिवारी पारा ३८.९ अंशांपर्यंत पोहचला होता. रविवारी तापमानात वाढ होऊन तापमान ३९ अंशांपुढे सरकले. याबरोबरच किमान तापमानामध्येही वाढ होऊ लागल्याने रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमान मागील दोन दिवसांपासून विशीच्या पुढे सरकले असून, रविवारी सकाळी २२ अंश इतके नोंदविले गेले. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना पुन्हा चाळिशीपार गेलेल्या तापमानाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे शाहरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.दहा वर्षांचा विक्रम यंदा मोडलामागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम यावर्षी मोडला गेला. मागील महिन्यात २७ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते.अशी आहेत उष्माघाताची लक्षणेथकवा जाणवणे, ताप येणे, त्वचा कोरडी होणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोकेदुखी, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, घाम येणे अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा. बर्फाचे पाणी अथवा विविध प्रकारच्या ज्यूसमध्ये बर्फ अतिप्रमाणात टाकून घेणे टाळावे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान